पाटणा : महाराष्ट्रात शिवसेनेत निर्माण झालेल्या दुफळीमुळे महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाले. या सर्व घडोमोडीत आपला सहभाग नसल्याचे सांगत भाजपाने हात झटकले आहेत. मात्र बिहारमधील भाजपा नेते सुशील कुमार मोदी यांच्या वक्तव्यावरून या राजकीय उलथापालथीमागे भाजपाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
He (Nitish Kumar) won't get that respect with RJD that he got while being with BJP. We made him CM despite having more seats & never tried to break his party. We broke only those who betrayed us. In Maharashtra, Shiv Sena betrayed us & faced consequences: BJP RS MP Sushil Modi pic.twitter.com/8fBexF7esc
— ANI (@ANI) August 9, 2022
राज्यामध्ये 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाबरोबरची युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसच्या मदताीने सत्ता स्थापन केली. याचमुद्द्यावरून शिवसेनेत विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदारांनी ‘उठाव’ केला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. जवळपास 15-20 दिवस चाललेल्या या नाट्यमय घडामोडींशी भाजपाचा संबंध नसल्याने भाजपाने वारंवार म्हटले होते. मात्र, खुद्द एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलेल्या वक्तव्याने भाजपाच्या या दाव्यातील हवाच काढून घेतली होती. बाकीचे बंडखोर आमदार झोपलेले असताना मी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांना भेटत होतो, असे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सांगितले होते.
तर, आता बिहारमध्येही राजकीय समीकरणे बदलली आहेत. भाजपाची साथ सोडत मुख्यमंत्री नितीश कुमार हे राजद आणि काँग्रेसची मदत घेत सत्ता स्थापन करणार आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा सदस्य सुशील कुमार मोदी यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका करताना शिवसेना आम्हीच तोडल्याचे मान्य केले आहे. भाजपाने आजपर्यंत कोणत्याही मित्रपक्षाला धोका दिलेला नाही. ज्यांनी आम्हाला धोका दिला, तो पक्ष आम्ही तोडला, असे सांगताना त्यांनी शिवसेनेचे उदाहरण दिले.
नड्डांचाही तोच सूर
देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे. काँग्रेसचेही अनेक राज्यांतून गाशा गुंडाळणे सुरू आहे. उर्वरित सर्व प्रादेशिक पक्षही संपतील, देशात केवळ भाजप राहील, असा दावा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी यापूर्वी केला होता. त्याच्याच अनुषंगाने आता भाजपा लक्ष्य ठरलेला आहे.
शिवसेनेची नड्डांवर टीका
शिवसेनेला संपविण्याची भाषा करणे हा कृतघ्नपणाचा कळस आहे. याच शिवसेनेने पंचवीसेक वर्षे भाजपास खांद्यावर घेऊन फिरवले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांच्या नावावरच महाराष्ट्रात आपण तरलात. दुसरे म्हणजे संपूर्ण जग नरेंद्र मोदी यांच्याविरोधात उभे ठाकले असताना हिंदुत्त्वासाठी म्हणून एकमेव बाळासाहेब ठाकरेच मोदींची पाठराखण करीत होते. त्या शिवसेनाप्रमुखांची शिवसेना संपवायला निघालेलेल जे.पी.नड्डा हे कोणत्या हवेत आहेत? असा सवाल शिवसेनेने केला होता.