पालीतील अंबा नदी पुलाजवळ नदीपात्रात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या व मासळी टाकलेली आढळली. यामुळे अंबा नदीचे पाणी दूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे प्रकार वारंवार घडत असल्याचे स्थानिकांनी सांगितल आहे.
काही मासळीवाले व चिकन व्यावसायिक न विकला गेलेला माल आणि सडलेली मासळी व मेलेल्या कोंबड्या नदीत रात्री फेकून देतात. सध्या नदीचे पाणी वाहते नाही. बंधारा बांधून अडविण्यात आले आहे. परिणामी या मेलेल्या कोंबड्या व मासळी नदीपात्रात तिथेच पडून राहते व सडते. त्यामुळे पाणी दूषित होत आहे. हेच पाणी कोणतीही प्रक्रिया न करता पालीकरांना पुरविले जाते. परिणामी रोगराई पसरण्याचा धोका देखील आहे.
- नगर पंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेतली पाहिजे. जे कोणी असा प्रकार करत आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.
– मंगेश यादव, जिल्हा अध्यक्ष, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था, महाराष्ट्र राज्य - नगरपंचायतीच्या माध्यमातून लगेच या दुकानदारांना नोटीस पाठविण्यात येईल. कोणीही अशा प्रकारे नदीचे पाणी दूषित करू नये. – दिलीप रायण्णावार, तहसिलदार