घररायगडमुरूडमध्ये मासळीचा दुष्काळ; १०० नौका किनाऱी

मुरूडमध्ये मासळीचा दुष्काळ; १०० नौका किनाऱी

Subscribe

’समुद्र उशाशी आणि मच्छीमार उपाशी’ या म्हणीची प्रचिती मुरूडच्या समुद्रात सातत्याने मच्छीमारी करणार्‍या मच्छीमारांना येत आहे.ऐन हंगामात कित्येक दिवसांपासून मुरूड परिसरातील समुद्रात मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांच्या एकूणच उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याचे कोळीवाड्यातुन फिरताना दिसून येत आहे. तर १०० नौका किनाऱी असल्याचे दृश्य सध्या सार्‍यांनाच अस्वस्थ करीत आहे.

नांदगाव: ’समुद्र उशाशी आणि मच्छीमार उपाशी’ या म्हणीची प्रचिती मुरूडच्या समुद्रात सातत्याने मच्छीमारी करणार्‍या मच्छीमारांना येत आहे.ऐन हंगामात कित्येक दिवसांपासून मुरूड परिसरातील समुद्रात मासळी मिळत नसल्याने मच्छीमारांच्या एकूणच उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याचे कोळीवाड्यातुन फिरताना दिसून येत आहे. तर १०० नौका किनाऱी असल्याचे दृश्य सध्या सार्‍यांनाच अस्वस्थ करीत आहे.
मार्च महिना संपत आला, तरी देखील ऐन हंगामात छोटी- मोठी मासळी देखील मिळणे अत्यंत कठीण झाले असून अनेक नौका मुरूड, एकदरा,राजपुरी नांदगाव, बोर्ली आदी गावी किनार्‍यावर नांगरून ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. याबाबत बोलताना एकदरा या गावातील मच्छीमार रोहन निशानदार म्हणाले की, खोल समुद्रात २ टन बर्फ, ६०० लिटर्स डिझेल भरून मासेमारीस गेलेल्या दालदी जाळीने मासेमारी करणार्‍या नौका मासळी मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतत आहेत.यातील काही नौकाना फक्त कुपा नावाची मासळी काही प्रमाणात मिळाली आहे. कुपा मासळीला परदेशात भाव मिळतो. मात्र आपल्या भागात फारसा भाव मिळत नाही. मुरूड सारख्या भागात कुपा मासळी किलोवर न विकता प्रत्येकी ५० रुपायाला एक अखंड मासा या प्रमाणे विकला जातो. त्यामुळे कुपा मिळाला तरी मच्छीमारांचा खर्च देखील सुटत नाही,ही आजची परिस्थिती आहे.
दिवसा गणिक मुरूड परिसरात मोठ्या मासळीची कमतरता उग्र स्वरूप धारण करील असे शुक्रवारी ठिकठिकाणी ऐकायला मिळत होते.एके काळी उदंड मासळी मिळणार्‍या मुरूडच्या अरबी समुद्रात अचानक मासळी उत्पादन नीचांक पातळीवर घटल्याने मच्छीमारांसाहित अनेकांना जबरदस्त धक्का बसला आहे. मासळीच्या या समस्येवर आपले महाराष्ट्र शासन कशाप्रकारे उपाययोजना करणार या कडे सर्वांचे डोळे लागून आहेत.

शासनाकडून पदतीची अपेक्षा
आकस्मिक बदलते वादळी वातावरण, समुद्रात होणारे प्रदूषण, एलइडी, पर्सनीन मासेमारी यामुळे छोटी मासळी, अंडी यांचा नाश होत असल्याने मासळीचे प्रमाण वेगाने घटले आहे. बोटीचा खर्च, खलाशी खर्च वसूल होत नसेल तर उदरनिर्वाह चालवायचा कसा असा प्रश्न पारंपरिक मासेमारी करणार्‍या मच्छीमारांना पडला आहे.होळीनंतर खोल समुद्रातील मासळी अंडी घालण्यासाठी उथळ खडकाळ समुद्रकिनारी येत असते.त्यावेळी नौकांना मासळी मिळत नाही.मुरूड, राजपुरी, एकदरा येथील सुमारे शंभर नौका अशा परिस्थिती मुळे किनार्‍यावर परत आल्या असून त्या नांगरण्यात आल्या आहेत. आता तर कोलंबी, मांदेली, जवळा देखील मिळत नाही. अतिशय चिंताजनक असे चित्र आहे. आर्थिक पॅकेज नाही. शासनाच्या घोषणाबाजीचा वेळीच उपयोग नसेल तर काय उपयोग? असे सांगत शासनाकडून पदतीची अपेक्षा मच्छीमार व्यक्त करीत आहेत.

- Advertisement -

दोन पापलेट १००० रुपयांना
शुक्रवारी मुरूड मासळी मार्केटमध्ये फेरफटका मारला असता येथील समुद्रातील मोठी मासळी दिसून आली नाही.मोजक्याच मासळी विक्रेत्या महिला अलिबाग परिसरातून ’एलइडी’ मासेमारीतून मिळालेली म्हणजे बाहेरगावहून आलेली मोजकीच मासळी विक्री करताना दिसल्या. उपलब्ध मासळीचे दर गगनाला भिडलेले दिसून आले. नेमकेच बांगडे, कोलंबी, छोट्या सुरमई आणि काटेरी मासळी होती. दोन पापलेटची किंमत १००० रुपये सांगितल्याने अनेक ग्राहक तेथून पुढचा रस्ता पकडत असल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -