घररायगडपाण्याअभावी तळोजेतील उद्योग संकटात

पाण्याअभावी तळोजेतील उद्योग संकटात

Subscribe

कारखानदार आणखी अडचणीत सापडण्याची भीती

 

 

- Advertisement -

 

 

- Advertisement -

पनवेल: महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) कडून होत असलेल्या अपुर्‍या पाणी पुरवठ्यामुळे तळोजे उद्योगिक वसाहतीमधील उद्योग संकटात सापडले आहेत. दैनंदिन उपयोगासाठी लागणारे पाणी उपलब्ध होत नाही, परिणामी अनेकदा कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया बंद ठेवावी लागत असल्याने अडचणीत आलेल्या कारखानदारांना पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी कारखानदारांची संघटना असलेल्या तळोजा इंडस्ट्रीयलिस्ट असोशियन च्यावतीने करण्यात आली आहे. पाणी टंचाईमुळे अनेक कारखान्यांमधील उत्पादन प्रक्रिया बंद ठेवावी लागत आहे. मात्र या कालावधील कामावर असणार्‍या कामगारांचे वेतन सुरूच ठेवावे लागत असल्याने अगोदरच अडचणीत असलेले कारखानदार आणखी अडचणीत सापडण्याची भीती कारखानदारांकडून व्यक्त केली जात आहेत.
जवळपास ९०७ हेक्टर परिसरात असलेल्या तळोजे औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना दररोज २५ दशलक्ष घनमीटर एवढ्या पाण्याची आवश्यकता भासते.औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने ही गरज भगवली जात असून, वसाहती भोवताळच्या वसाहती आणि गावांना देखील एमआयडीसीच्या बारवई धरणातून येणार्‍या जलवाहिन्यांमधून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

वसाहतींना पुरवले जाते पाणी
जवळपास साडेनऊशे लहान मोठे कारखाने असलेल्या तळोजे औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने पाणी पुरवठा करण्यात येतो.बारवी धरणातील पाण्याचा वापर याकरीता करण्यात येत असून गेल्या काही दिवसात बारवाई धरणातील हे पाणी तळोजा औद्योगिक वसाहती मधील कारखान्यांना न पुरवता पनवेल पालिका क्षेत्र तसेच सिडको वसाहतींमधील सदनिका धारकांना पुरवले जात असल्याने पाण्या अभावी औद्योगिक वसाहती मधील कारखानदारांची स्थिती गंभीर झाली आहे.

मागील ३ आठवड्या पासून सुरु असलेल्या या पाणी टंचाईमुळे कारखान्यातील कामगारांना पिण्यायोग्य पाणी देखील मिळणे अवघड झाल्याने विकतचे पाणी आणून कामगारांच्या पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी लागत आहे. तर कारखान्यातील उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवता यावी या करिता टँकरचे पाणी मागवावे लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक भुर्दंड कारखानदारांवर पडत आहे.
– सतीश शेट्टी,
अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रियलिस्ट असोशियन

बारवी धरणावर असलेल्या पाणी पुरवठा यंत्रणेेत तांत्रिक बिघाड झाल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. येत्या काळात हा पुरवठा सुरळीत होईल.
– अविनाश गाधडे,
उपाभियंता. एमआयडीसी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -