घररायगडरायगडमधील चार ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन; आणखी ४३ ग्रामपंचायतींचीही प्रयत्नशील

रायगडमधील चार ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन; आणखी ४३ ग्रामपंचायतींचीही प्रयत्नशील

Subscribe

तालुक्यातील कामार्ली ग्रामपंचायतीसह उरणमधील पुनाडे आणि दिघोडे तसेच पेण तालुक्यातील उंबर्डे या चार ग्रामपंचायतीना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. चार ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवक याच्याकडे डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सल्लागार कंपनीचे विकास जाधव, उरण विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर उपस्थित होते.

अलिबाग: तालुक्यातील कामार्ली ग्रामपंचायतीसह उरणमधील पुनाडे आणि दिघोडे तसेच पेण तालुक्यातील उंबर्डे या चार ग्रामपंचायतीना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. चार ग्रामपंचायतींच्या सरपंच व ग्रामसेवक याच्याकडे डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी सल्लागार कंपनीचे विकास जाधव, उरण विस्तार अधिकारी अनिल नारंगीकर उपस्थित होते. विशेष म्हणजे जानेवारी महिन्यात जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींनी आयएसओ मानांकन प्राप्त केले होते. तसेच जिल्ह्यातील आणखी ४३ ग्रामपंचायतींची आयएसओ मानांकन प्रमाणपत्र मिळविण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे.
शासन व्यवहारात पारदर्शकता तसेच गतिमानता यावी यासाठी ई गव्हर्नन्सचा वापर केला जात आहे. ग्रामपंचायतीमधील विविध रजिस्टर्स,फॉर्मस, दस्ताऐवजांचे संगणकीकरण करून पेपरलेस ग्रामपंचायतींकडे वाटचाल सुरू आहे. बदलत्या परिस्थितीत ग्रामपंचायतींची कार्यपद्धतीचे पुनर्विलोकन करून व्यवसाय प्रक्रिया पुनर्निर्मिती करण्याची गरज आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रशासकीय कामकाज कार्यक्षम व्हावे आणि कार्यपद्धतीत गुणात्मक सुधारणा करण्यासाठी आयएसओ प्रमाणिकीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने २०१९ मध्ये घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.

शासकीय योजना राबविण्यावर भर
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सुशोभीकरण, ग्रामपंचायतींचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, स्वच्छतागृहे बांधणे, गावात साफसफाई असणे, गावात व्यायमशाळा, स्वच्छ पाणीपुरवठा करणे, घरपट्टी पाणीपट्टी वसुली, ग्रामसभांत नियमित विषयांवर चर्चा, गावात वृक्षारोपण करणे यासह इतर शासकीय योजना राबविण्यावर भर देण्यात येत आहे, या सर्व बाबींकडे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील सातत्याने पाठपुरावा करीत होते.

- Advertisement -

……………. ====

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -