घररायगडजमीन गैरव्यवहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

जमीन गैरव्यवहार प्रकरणी अखेर गुन्हा दाखल

Subscribe

रोहा पोलीस दलालांच्या दबावाखाली- उल्का महाजन

रोहा तालुक्यातील अनेक जमीन घोटाळे बाहेर येऊ लागले आहेत. चणेरातील करोडो रुपये किमतीची सरकारी दिव जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर शिलोशी गाव हद्दीतील जमीन घोटाळा सर्वहारा जनआंदोलनाने उघड केला आहे. रायगड जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर अखेर जमीन गैरव्यवहार प्रकरणी तब्बल सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याने दलाल लॉबीला मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे.

सर्वहारा जनआंदोलनाच्या पाठपुराव्याने तातडीने संबंधितांवर गुन्हा दाखल झाल्याने रायगड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. रोहा पोलीस दलाल लॉबीच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सर्वहरा आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केला आहे. तालुक्यातील चणेरा विभागात बल्क ड्रग्ज फार्मासाठी भूसंपादन सुरू आहे. त्यासाठी दलालांचा मोठा सुळसुळाट निर्माण झाला आहे. दिव जमीन महाघोटाळा प्रकरणात दलाल मालामाल झाले. सर्वाधिक मोठे दिव जमीन गैरव्यवहार प्रकरण सर्वहरा जनआंदोलनाने समोर आणले. सलाम रायगडने सातत्याने पाठपुरावा केला आणि खाजण जमीन पुन्हा सरकारी जमा झाली.

- Advertisement -

हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा दलालांनी मयत पणजोबा, आजोबा जिवंत करून कोल्हटकर कुटुंबाची जमीन परस्पर विकण्याचा घाट घातला. गट नंबर १५२ क्षेत्र ०० -३२-९० आर ही जमीन परस्पर विकण्यात आली. गणेश कोल्हटकर यांचे पणजोबा हशा नागू कोल्हटकर १९७५ साली मयत झाले. त्यांच्या जागी तोतया इसम उभा करून २०११ रोजी कोल्हटकर कुटुंबियांची जमीन विकण्यात आली. याबाबत गणेश कोल्हटकर यांनी सर्वहारा जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि धक्कादायक प्रकरण समोर आले. तक्रार करूनही रोहा पोलिसांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली नाही.

याउलट दुसर्‍या प्रकरणात दत्ता कांबळे यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी कांबळे यांच्या वृद्ध आईलाच आरोपी केले. त्या अपंग व निरीक्षर आहेत, अशी माहिती कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी दिली. ज्या शेतकर्‍यांची दलालांनी फसवणूक केली. त्या दलालांवर गुन्हे दाखल होऊ नयेत असे उद्योग रोहा पोलिसांनी केले. त्यामुळे आम्ही या गंभीर प्रकरणाकडे खुद्द जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड यांचे लक्ष वेधले. प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानुसार गुरुवारी संबंधीतांवर गुन्हा दाखल झाले आहे. पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी पीडित शेतकर्‍यांना भेट दिली. त्या बैठकीत शेतकर्‍यांचे प्रश्न समजून घेऊन तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -