घररायगडमहाड : पूर पाहताना एकाचा मृत्यू

महाड : पूर पाहताना एकाचा मृत्यू

Subscribe

मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे.

महाडमध्ये दोन दिवस कोसळधार सुरू असून, तालुक्यातील सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. पुराचे पाणी शहरातील बिरवाडीसह औद्योगिक परिसरात घुसले असून, यामुळे शहरातील बैठ्या घरांचे आणि लगतच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर हाच पूर पाहत असताना गच्चीवरून पाय घसरल्याने एकाला आपला प्राण गमवावा लागला आहे. अप्सरा हॉटेलसमोर असलेल्या एका इमारतीत ही दुर्घटना घडली. दरम्यान, तालुक्यातील दासगावमध्ये असिफ बागवान यांच्या घरात पाणी शिरल्याने 6 ते 7 जण अडकून पडले होते. त्यांना एका रेस्क्यू पथकाने बाहेर काढले आहे. पालकमंत्री आदिती तटकरे येथे येत असताना महामार्गावर पाणी असल्याने त्या दासगावमध्येच थांबल्या आणि रेस्क्यूची पाहणी केली.

मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. खळखळून वाहणाऱ्या या नद्यांना आलेल्या पुराने शहरात पहाटेच्या सुमारास प्रवेश केला. मुख्य बाजारपेठ, गांधारी नाका, शेंडाव नाका, रोहिदास नगर, छत्रपती शिवाजी चौक, काकरतळे, नवेनगर, कुंभारआळी आदी परिसरात पाणी शिरल्याने बैठ्या घरांना आणि दुकानदारांना फटका बसला आहे. या पुरामुळे महाड-रायगड मार्गावरील लाडवली पुलावरून आणि दादली पुलावरून पाणी गेल्याने या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

- Advertisement -

कारखान्यांना देखील पुराच्या पाण्याचा फटका

औद्योगिक क्षेत्रात देखील काळ नदीचे पाणी शिरल्याने त्या परिसरातील अंतर्गत मार्ग बंद झाले. शिवाय कारखान्यांना देखील या पुराच्या पाण्याचा फटका बसला. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडी गावाकडे जाणार्या चित्तदरवाजा ते निजामपूर या मार्गावर तीन ठिकाणी दरडी कोसळल्या. यामुळे हा मार्ग देखील ठप्प झाला.शहरात दरवर्षी अतिवृष्टीनंतर पुराचे पाणी येते. हे पाणी पाहण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. दादली पूल, गांधारी आदी ठिकाणी हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी असते. असाच पूर पाहण्यासाठी इमारतीच्या गच्चीवर गेलेल्या एकाचा पाय घसरून खाली पडल्याने मृत्यू झाला.


हेही वाचा – पेगॅसस हेरगिरी प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली चौकशी करा – नाना पटोले

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -