घररायगडपालीत मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांना उकिरड्याचा आधार

पालीत मोकाट गुरे, भटक्या कुत्र्यांना उकिरड्याचा आधार

Subscribe

पालीतील जुने पोलीस स्थानक, कुंभारआळी, बाजारपेठ, मधली आळी, बल्लाळेश्वर मंदिर, महाकाली मंदिर परिसर, मिनिडोअर स्टॅन्ड, भोईआळी, आगर आळी या ठिकाणी कचरा कुंड्यांवर सकाळपासूनच मुकाट गुरांची गर्दी असते. येथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात.

उन्हाचा तडाखा सर्वत्रच वाढला आहे. अशातच जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चार्‍याचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे मोकाट जनावरांना खाण्यासाठी अन्न,पाण्याची कमतरता भासू लागली आहे. पालीमध्ये मोकाट गुरे कचराकुंड्या व उकिरड्यावर मिळेल ते खात आहेत. तसेच भटके कुत्रे देखील उकिरड्यावर येत आहेत. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय कचर्‍याची समस्या गंभीर होऊन स्वच्छतेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.

पालीतील जुने पोलीस स्थानक, कुंभारआळी, बाजारपेठ, मधली आळी, बल्लाळेश्वर मंदिर, महाकाली मंदिर परिसर, मिनिडोअर स्टॅन्ड, भोईआळी, आगर आळी या ठिकाणी कचरा कुंड्यांवर सकाळपासूनच मुकाट गुरांची गर्दी असते. येथे टाकलेला कचरा ही गुरे अस्ताव्यस्त करतात. त्यामुळे येथे घाण व दुर्गंधी पसरते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बर्‍याचवेळा टाकून दिलेले अन्न पदार्थ पिशव्यांमध्ये असते. परिणामी गुरांच्या पोटात कमी अधिक प्रमाणात प्लॅस्टिक जाते. प्लॅस्टिक व सडके आणि कुजलेले अन्न पदार्थ खाऊन या जनावरांच्या आरोग्यावर घातक परिणाम होतात. त्यांची पचनशक्ती मंदावते.

- Advertisement -

अन्नाच्या शोधात सतत चालल्याने त्यांची ऊर्जा कमी होते. अशक्तपणा येतो. कचरा कुंड्यामध्ये व उकिरड्यावरील कचर्‍यात धातू तसेच घरगुती वापराची सुई, इंजेक्शनच्या सुय्या आदी घटक असतात. त्या पोटात गेल्यामुळे जनावरांच्या जठराला व अन्ननलिकेला इजा पोहचते. सतत प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते त्यांच्या पोटात साठते. त्यामुळे गुरे मरतात देखील. काही वेळेस अशा मेलेल्या गुरांची हाडे इतर गुरे आणि प्राणी चघळतात व पर्यायाने त्यामुळे त्यांचा देखील मृत्यू होतो. हे दुष्टचक्र असे सुरूच राहते.

उष्म्याने जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे शेतकरी किंवा गुरे पालक आपली गुरे चरण्यासाठी मोकाट सोडून देतात. शासनाने मोकाट गुरांच्या चारा पाण्याची व्यवस्था केली पाहिजे. किंवा पशुपालकांना यासाठी अनुदान दिले पाहिजे. नागरिकांनी कचराकुंड्यांमध्ये कचरा न टाकता घंटागाडीतच कचरा टाकावा. जेणेकरून गुरे तेथे येणार नाहीत.
आरिफ मणियार, उपनगराध्यक्ष, पाली नगरपंचायत

- Advertisement -

भारतात सुक्या पेक्षा ओला कचराच जास्त असतो. ओल्या कचर्‍याचे कंपोस्ट केल्यास त्याचा पर्यावरणाला फायदा होऊ शकतो. ओला व सुका कचरा एकत्र गोळा करून तो क्षेपणभूमीवर टाकणे म्हणजे ‘घनकचरा व्यवस्थापन’ असे जर प्रशासनाला वाटत असेल तर पाली शहरातील कचरा समस्या सोडवणे अशक्य आहे. एखादा ठेकेदार नेमून हा प्रश्न सुटेल असेही नाही. नागरिकांमध्ये ओला कचरा, सुका कचरा विलिगीकरणाबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. करोडो रुपयाचा ठेका देण्याऐवजी काही लाखांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करता येते. गरज आहे ती सकारात्मक मानसिकतेची व नागरिकांच्या कराचा पैसा वाचविण्याची.
– दत्तात्रय दळवी, स्वयंपूर्ण सुधागड

शेतकर्‍यांनी व पशुपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नये. त्यांना पेंढा किंवा सुके गवत खाऊ घालावे. कचर्‍यात किंवा उकिरड्यावर टाकलेले अन्न पदार्थ खाऊन गुरांची पचनक्रिया बिघडते. मानवी खाद्य हे जनावरांसाठी नाही. वारंवार प्लॅस्टिक पोटात गेल्याने ते पोटात साठून गुरांचा मृत्यू देखील होऊ शकतो. शहरी तसेच ग्रामीण भागात निसर्गपूरक जीवन अंगिकारणे गरजेचे आहे.
– डॉ. प्रशांत कोकरे, तालुका पशुधन विकास अधिकारी, सुधागड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -