घररायगडमहिलांच्या पुढाकारामुळे रसायनीतील गुळसुंदेवासीयांना मिळाले शुद्ध पाणी

महिलांच्या पुढाकारामुळे रसायनीतील गुळसुंदेवासीयांना मिळाले शुद्ध पाणी

Subscribe

रसायनी परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे हद्दीतील नागरिकांचां पाणी प्रश्न अखेर निकाली निघाला असून येथील लाडीवली आदिवासी वाडी, लाडीवली गाव, आकुलवाडी, गुळसुंदेसह इतर वाड्याना एम.आय.डी.सी.कडून शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याने येथील महिला वर्गात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. २०२० ला जागतिक महिला दिन साजरा करीत असताना लाडिवली गावातील महिला आणि आदिवासी बांधवांन्नी संकल्प केला आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी (पनवेल) या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पाठपुराव्याला सुरुवात केली आणि त्यास आता यश आले.

रसायनी: रसायनी परिसरातील ग्रुप ग्रामपंचायत गुळसुंदे हद्दीतील नागरिकांचां पाणी प्रश्न अखेर निकाली निघाला असून येथील लाडीवली आदिवासी वाडी, लाडीवली गाव, आकुलवाडी, गुळसुंदेसह इतर वाड्याना एम.आय.डी.सी.कडून शुद्ध पाणी पुरवठा सुरू करण्यात आल्याने येथील महिला वर्गात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. २०२० ला जागतिक महिला दिन साजरा करीत असताना लाडिवली गावातील महिला आणि आदिवासी बांधवांन्नी संकल्प केला आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी (पनवेल) या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पाठपुराव्याला सुरुवात केली आणि त्यास आता यश आले.
मागील १९ वर्ष रायगड जिल्हा परिषदेच्या चावणे पाणीपुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र बंद व जीर्ण अवस्थेत असल्याने पाताळगंगेचा अशुद्ध पाणी प्रक्रियेविणा येथील नागरिकांना पुरविला जात होता.सन २०२० ला जागतिक महिला दिन साजरा करीत असताना लाडिवली गावातील महिला आणि आदिवासी बांधवांन्नी संकल्प केला आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधनवाडी (पनवेल) या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून पाठपुराव्याला सुरुवात केली.
रविवारपासून गुळसुंदे ग्रामपंचायतीमधील लाडीवली, गुळसुंदे, आकुळवाडी, चिंचेचीवाडी, डोंगरीवाडी, फलाटवाडी, लाडीवली आदिवासी वाडी येथील नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा सुरु झाला. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील मिटकरी आणि लाडिवलीतील महिलांनी या पाण्याचा शुभारंभ केला.यावेळी लाडीवलीतील गावकर्‍यांनी दाखवलेल्या एकीमुळेच हे शक्य झाल्याचे सांगत रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले. एमआयडीसीचे शुध्द पाणी आणण्यासाठी विजया मांडवकर, सुरेखा वाघे, राजेश्री म्हामनकर, ज्योती पाटील, राजेश्री भोसले, निता वाघे, आशा शेडगे, रेखा कालेकर,सविता पवार, मानसी वाघे,प्रशाली शेडगे ,दर्शना म्हामनकर आदींनी महत्वाची भूमिका पार पाडली. तर पाणी प्रश्न सोडविण्यासाठी लाडीवलीं गावांतील आणि आदिवासी वाडीतील माता भगिनींचां संघर्ष इतरांना प्रेरणादायी ठरेल असे मत रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी व्यक्त केले.

महिलांनी काढले मोर्चे आणि केली आंदोलने
आवश्यक कागदोपत्री दस्ताऐवज पुरविण्यासही टाळाटाळ करण्यात आली परंतु त्या विरोधालाही न जुमानता या महिलांनी मोर्चे,आंदोलने केली तरीही प्रशासकीय यंत्रणा लक्ष देत नाही म्हणून रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यातील बारा महिलांनी आमरण उपोषणासारखा हत्यार उपसून मागील तीन वर्षे सातत्याने पाठपुरावा करीत एमआयडीसीचे कनेक्शन मिळविले आणि जलजीवन मिशन मधून एक कोटी २६ लाख रुपयांचा निधीही मंजूर करून घेतले. त्यानंतर एवढ्यावरच न थांबता ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अभियंताच्यामागे लागून योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आणि रविवारपासून गुळसुंदे ग्रामपंचायतीमधील लाडीवली, गुळसुंदे, आकुळवाडी, चिंचेचीवाडी, डोंगरीवाडी, फलाटवाडी, लाडीवली आदिवासी वाडी येथील नागरिकांचा अशुद्ध व अनियमित पाणी पुरवठ्यापासून मुक्तता देत एमआयडीचीच्या शुध्द पाणी पुरवठ्यास सुरवात केली शनिवारी २५ मार्च रोजी कोणताही गाजावाजा न करता जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील मिटकरी आणि लाडिवलीतील महिलांनी पाण्याचा शुभारंभ केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -