Eco friendly bappa Competition
घर क्रीडा 39 वर्षांची प्रतीक्षा कायम, भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा फायनल नाही; शोएब अख्तर...

39 वर्षांची प्रतीक्षा कायम, भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा फायनल नाही; शोएब अख्तर म्हणाला…

Subscribe

गुरुवारी झालेल्या दमदार सामन्यात श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. चारिथ असलंकाने आपल्या दमदार खेळीमुळे संघाला विजय मिळवून दिला. बाबर आझमचा संघ स्पर्धेतून बाहेर पडताना पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने याबद्दल खंत व्यक्त केली.

Asia Cup 2023: आशिया चषक 2023 च्या सुपर फोर फेरीच्या सामन्यात श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव करून त्यांना अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढले. आशिया चषक स्पर्धेतून पाकिस्तान संघ बाहेर पडल्यानंतर शोएब अख्तरने खंत व्यक्त केली आहे. शोएब म्हणाला की, आशिया चषकात पाकिस्तान-भारत फायनल कधीही होऊ शकत नाही.

गुरुवारी झालेल्या दमदार सामन्यात श्रीलंकेने शेवटच्या चेंडूवर पाकिस्तानचा दोन गडी राखून पराभव केला. चारिथ असलंकाने आपल्या दमदार खेळीमुळे संघाला विजय मिळवून दिला. बाबर आझमचा संघ स्पर्धेतून बाहेर पडताना पाहून पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने याबद्दल खंत व्यक्त केली. (Asia Cup 2023 39 year wait ends India Pakistan final no more Shoaib Akhtar said )

शोएब अख्तरने व्यक्त केली खंत

- Advertisement -

शोएब अख्तरने पाकिस्तानकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा वेगवान गोलंदाज जमान खानचे कौतुक केलं आहे. हरिस रौफला दुखापत झाल्यानंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला होता. जमानला या सामन्यात एकही बळी मिळाला नाही. त्याने 6 षटकात 39 धावा दिल्या. परंतु त्याच्या परफॉर्मंसवर शोएब अख्तर प्रभावित झाला.

शोएब अख्तर त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, तुम्ही सामना पाहिला आहे. पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडला आहे. जो सामना पाकिस्तानच्या बाजूने झाला होता तो सर्व जमन खानने केला होता.

- Advertisement -

पाकिस्तानला सामना जिंकण्याची जी काही संधी होती, ती सर्व त्याच्यामुळेच होती. शाहीन आफ्रिदीनेही काही विकेट घेतल्या, पण याचे श्रेय जमानला जाते. त्याने खरोखरच चांगली गोलंदाजी केली. श्रीलंकेने चांगला खेळ केला आणि अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

आशिया चषक स्पर्धा 1984 पासून खेळवली जात आहे. आतापर्यंत या स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 39 वर्षांत कधीही खेळला गेला नाही. एकदिवसीय आणि T20 सह, भारताने सात वेळा आशिया चषक जिंकला आहे आणि श्रीलंकेने सहा वेळा जिंकला आहे. भारताने 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये विजेतेपद पटकावले, तर श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008, 2014 आणि 2022 मध्ये विजेतेपद पटकावले.

पाकिस्तान संघ दोन वेळा चॅम्पियन बनला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय आशिया चषकाची ही आठवी अंतिम फेरी असेल. 2010 मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोघे शेवटचे आमनेसामने आले होते. त्यानंतर भारताने श्रीलंकेचा 81 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत उभय संघांमध्ये झालेल्या गेल्या सात सामन्यांमध्ये भारतीय संघाने चार वेळा तर श्रीलंकेच्या संघाने तीन वेळा विजय मिळवला. 1984 मध्ये राऊंड रॉबिन प्रकारात अव्वल स्थान मिळवून भारतीय संघ चॅम्पियन बनला. श्रीलंकेचा संघ उपविजेता ठरला. त्या वर्षी फायनल झाली नाही. 1986 पासून फायनल खेळायला सुरुवात झाली.

(हेही वाचा: Asia Cup 2023 : पाकिस्तानचे आशिया चषकाचे स्वप्न भंगले, ICC च्या क्रमवारीतही घसरण )

- Advertisment -