इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन्स गेम्समध्ये भारतीय कबड्डी महिला संघाने आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात सामन्यात जपानवर ४३-१२ अशा उत्कृष्ठ फरकाने विजय मिळवल्यानंतर आता दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेवर ३८-१२ च्या फरकाने विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.
A fabulous run for the Indian Women’s Kabaddi team as they register their third straight win in three games of the Preliminary Round at the #AsianGames2018 . #TeamIndia defeated Sri Lanka 38-12#IAmTeamIndia Congratulations ✌ pic.twitter.com/ezx1a7sB7h
— Team India (@ioaindia) August 21, 2018
‘अ’ गटातील सातवा सामना हा भारत आणि श्रीलंका यांच्यात पार पडला असून. सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारताने आपले वर्चस्व कायम ठेवत अप्रतिम खेळ दाखवला. पहिल्या सत्रात भारताकडून आक्रमक खेळ दाखवला गेला. मात्र श्रीलंकेने ही अप्रतिम बचाव करत सामन्यात चांगली लढत दिली. मात्र दुसऱ्या सत्रात भारताने आपला खेळ आणखी उंचावत सामन्यात ३८-१२ च्या फरकाने विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे.