इंडोनेशियात सुरू असलेल्या Asian Games 2018 मध्ये भारताच्या पुरूष संघ सेमी फायनलच्या सामन्यात मलेशियकडून पराभूत झाला आहे. मलेशियाने भारताला पेनल्टी शूटआउटमध्ये ६-७ च्या फरकाने पराभूत करत अंतिम फेरी गाठली आहे.
FT| The Indian Men’s Hockey Team suffers a heart-breaking defeat against Malaysia as the match progressed to a sudden death in the intense Semi-Final clash at the @asiangames2018. #IndiaKaGame #AsianGames2018 #INDvMAS pic.twitter.com/AqftyfqwZ5
— Hockey India (@TheHockeyIndia) August 30, 2018
चुरशीच्या सामन्यात भारत पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत
भारत आणि मलेशिया यांच्यात झालेल्या सेमी फायनलच्या सामन्यात सुरूवातीपासूनच चुरस दिसून येत होती. सुरूवातीला भारताच्या हरमनप्रीतने ३३ व्या मिनीटाला गोल करत सामन्यात भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर मलेशियाच्या फैझलने ४० व्या मिनीटाला गोल करत सामन्यात बरोबरी साधली. मात्र लगेचच भारताच्या वरूणने गोल करता भारताला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारत सामना जिंकतो की काय असे वाटत असतानाच अखेरच्या ५९ व्या मिनीटाला मलेशियाच्या रहिमने गोल करत सामना बरोबरीत केला.
#TeamIndia at the #AsianGames2018
A last minute equaliser by #MuhammadRazie takes the Men’s Semifinal between #TeamIndia and Malaysia (2-2) into Penalty shoot-outs! #WatchNow & #Cheer your team!!!#AllTheBest @TheHockeyIndia ?#IAmTeamIndia pic.twitter.com/X1Nxh6SSnp— Team India (@ioaindia) August 30, 2018
मात्र त्यानंतर घेण्यात आलेल्या पेनल्टी शूटआउटमध्ये मात्र भारताला ६-७ च्या फराकाने पराभव स्वीकारावा लागला आहे.