भारताविरुद्धची कसोटी मालिका ही अशेस सारखी आहे, असं मत ऑस्ट्रलियाचा स्टार ऑफस्पिनर नॅथन लायन व्यक्त केलं आहे. ऑस्ट्रलिया २०१८-१९ च्या पराभवाचा बदला घेण्यासाठी तयार आहे, असंही तो म्हणाला. भारताने २०१८-१९ मध्ये झालेल्या मालिकेत ऑस्ट्रलियाला हरवलं होतं. ७१ वर्षांत पहिल्यांदा भारताने ऑस्ट्रलियामध्ये कसोटी मालिका जिकली होती.
भारताविरुद्धची कसोटी मालिका ही अशेस सारखीच आहे. भारताचा संघात उत्कृष्ट खेळाडूंचा भरणा आहे. भारत जेव्हा ऑस्ट्रलियात येईल तेव्हा एक मोठं आव्हान आमच्या समोर असेल, असं नॅथन लायनने म्हटलं आहे. यावर्षी भारत चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौर्यावर जाणार आहे. ही मालिका ३ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू होणार आहे.
३२ वर्षीय नॅथन लायन गेल्या १० वर्षांपासून ऑस्ट्रेलियाचा अव्वल फिरकीपटू आहे. नॅथन लायन म्हणाला, “आम्हाला माहिती आहे की अखेर सामने होतील. आम्ही चांगली तयारी करत आहोत आणि घरी आम्ही वेळेचा उपयोग करत आहोत.” पुढच्या महिन्यात जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात होणाऱ्या इंग्लंड-वेस्ट इंडीज कसोटी मालिकेवर आम्ही बारीक लक्ष ठेवणार असल्याचं लियान म्हणाला.