जितेगा भाई जितेगा! इंडिया जितेगा! अशा प्रकारच्या घोषणा आता भारतभरामध्ये दबक्या आवाजात का असेनात ऐकू येत आहेत. त्याला कारण म्हणजे इंग्लंडलविरोधातल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भारताची विजयाकडे सुरू असलेली घोडदौड. दुसऱ्या डावामध्ये ५२१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे ८ फलंदाज तंबुमध्ये परतले आहे. त्यामुळे विजयासाठी भारताला आता केवळ २ गडी टिपण्याची गरज आहे. विजयासाठी ५२१ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची फलंदाजी सपशेल अपयशी ठरली आहे. पहिल्या दोन कसोटी गमावल्यानंतर भारताने नॉटिंगहम कसोटीमध्ये जोरदार पुनरागमन केले.
विराटचे शानदार शतक
दुसऱ्या डावामध्ये कर्णधार विराट कोहलीने शानदार शतक ठोकत १०३ धावांची खेळी केली. शिखर धवन ४४, लोकेश राहुल ३६, चेतेश्वर पुजारा ७३ आणि अजिंक्य रहाणेने २९ धावा केल्या. हार्किद पांड्यानं नाबाद ५२ धावांची खेळी केली. परिणामी भारतानं ३५२ धावांपर्यंत मजल मारली. फलंदाजांनी सुरेख खेळी तर केली.
विजय हवाच
तिसऱ्या कसोटीमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये आव्हान कायम राखण्यासाठी भारताला विजय गरजेचा आहे. कारण यापूर्वीचे दोन्ही सामने भारताने गमावले आहे. त्यावरून बीसीसीआयने जाब विचारला. तर, माजी क्रिकेटर्सनं देखील भारताच्या कामगिरीवर टीका केली आहे.