घरक्रीडापंतला वगळा, साहाला संधी द्या!

पंतला वगळा, साहाला संधी द्या!

Subscribe

किरमाणी यांचे विधान

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीत रिषभ पंतला वगळून भारताने यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान साहाची निवड करावी, असे विधान भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम यष्टिरक्षकांपैकी एक असणार्‍या सय्यद किरमाणी यांनी केले. पंतला सध्या सुरू असलेल्या विंडीज दौर्‍यावर चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. तसेच खेळपट्टीवर वेळ घालवल्यानंतर खराब फटका मारून बाद होण्याच्या पंतच्या सवयीमुळे त्याच्यावर टीकाही झाली आहे. त्यामुळे दुखापतीमुळे मागील काही काळ संघातून बाहेर रहाव्या लागलेल्या साहाला पुढील कसोटीत संधी मिळायला पाहिजे, असे भारतासाठी ८८ कसोटी सामने खेळलेल्या किरमाणी यांना वाटते.

पंत हा खूपच प्रतिभावान खेळाडू आहे, पण त्याला अजून बरेच शिकण्याची गरज आहे. यष्टिरक्षण ही क्रिकेटमधील सर्वात आव्हानात्मक गोष्ट आहे. फक्त तुम्ही ग्लोव्हज घातले म्हणून यष्टीरक्षक होत नाही. साहाला दुखापत झाल्यामुळे संघातून बाहेर जावे लागले. मात्र, तो आता फिट झाल्याने त्याला पंतइतकीच संधी मिळायला हवी. त्याला जर संधी मिळणार नसेल, तर त्याला संघासोबत ठेऊन उपयोग काय? जो खेळाडू चांगली कामगिरी करत असेल, त्यालाच संघात स्थान मिळायला पाहिजे. स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण प्रदर्शन केल्यामुळे साहाची भारताच्या संघात निवड झाली, असे किरमाणी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -