भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राज आता विश्वचषकावर लक्ष केंद्रीत करणार असून मिताली राजने ३२ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाचे नेतृत्त्व केले. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा करणारी मिताली राज पहिली भारतीय फलंदाज ठरली होती. मिताली राजने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आधी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २००० धावा पूर्ण केल्या होत्या.
Former India T20I captain, Mithali Raj, has announced her retirement from T20 Internationals. pic.twitter.com/G4QdIvRgo3
— ANI (@ANI) September 3, 2019
मिताली राजने भारताकडून ८८ टी-२० सामन्यांचे नेतृत्त्व केले आहे. टी-२० करिअरमध्ये ३७.५२ च्या सरासरीने तिने २३६४ धावा केल्या आहेत. यामध्ये १७ अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये २०१२ (श्रीलंका), २०१४ (बांगलादेश) आणि २०१६ (भारत) या तीन टी-२० विश्वचषकांचा समावेश आहे.