भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज रंगत असून नाणेफेक जिंकून इंग्लंडन फलंदाजी करत आहे. उपांत्य फेरीगाठण्यासाठी अवघा एक विजय हवा असलेली विराट कोहलीची टीम इंडिया आज एजबस्टनच्या मैदानावर उतरली आहे. भारतासमोर यजमान इंग्लंडचं आव्हान असणार आहे. भारतीय संघाने या विश्वचषकात एकही सामना गमवला नाही. गुरुवारी वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात भारताने तब्बल १२५ धावांनी विजय मिळवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज यांना हरवून गुणतालिकेत ११ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे.
who will win today@CWC19_ICC @WahabViki @cricketworldcup @babarazam258 @BCCI @OfficialSLC pic.twitter.com/caTnuJg7gy
— ICC World Cup 2019 (@CWC19_ICC) June 30, 2019
- Advertisement -