पंजाबच्या मोहाली येथे सुरु असलेल्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने दमदार सुरवात केली आहे. रोहीत शर्मा आणि शिखर धवन या मैदानावर उतरलेल्या जोडीने दीडशतकी भागीदारी करत भारतीय डावाची चांगली सुरवात केली. मात्र शतकाच्या उंबरठ्यावर असताना मोठा फटका मारण्याच्या नादात रोहीत शर्मा ९५ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतरही शिखरधवनने आपली फटकेबाजी चालुच ठेवत १८ चौकार आणि तीन षटकार मारत १४३ धवाकेल्या. पहिल्या गड्यासाठी यादोघांनीही १९३ धावांची भागीदारी केली. या दोघांच्याही दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलिया समोर ३५५९ धावांच तगड आव्हान उभ केल आहे.
ऑस्ट्रेलिया समोर खडतर आव्हान
तीसऱ्या सामन्यातील पराभव विसरत, आजचा सामना जिंकुन मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ प्रयत्न करणार आहे. तर पहिल्या दोन सामन्यांतील पराभावा नंतर पुनरागम करणाऱ्या ऑस्टेलिया चौथा सामना जिंकत मालिका बरोबरीत आणण्यास प्रयत्न करेल.
संघातील बदल
मोहालीच्या सामन्यात भारताच्या अंबाती रायडू, महेंद्रसिंग धोनी, रवींद्र जाडेजा आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आली आहे. त्याजागी आजच्या सामन्यात लोकेश राहुल, ऋषभ पंत, युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार यांना संधी देण्यात आली आहे.