- शमीला बाद करत अँडरसनने नवा विक्रम केला आहे. कसोटी सामन्यांत तो सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज झाला आहे.
- शमीला बाद करत अँडरसनने इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केला आहे.
- इशांत आणि जडेजाही झटपट माघारी परतले आहेत.
- रशीदने पंतलाही माघारी पाठवले.
- १४९ धावांवर लोकेश राहुल बाद झाला असून भारताला हा सामना जिंकण्यासाठी अजून १३८ धावांची आवश्यकता आहे.
- रिषभ पंतने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे.
- भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने आपल्या कारकिर्दीतील ५ वे शतक झळकावले आहे.
- पाचव्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली झाली आहे. सलामीवीर लोकेश राहुलने मालिकेतील पहिले अर्धशतक झळकावले आहे.
- अडखळत्या सुरुवातीनंतर राहुल आणि रहाणेने भारताचा डाव सावरला आहे.
- या संपूर्ण मालिकेप्रमाणेच भारताची सुरूवात अडखळती झाली आहे. भारताने अवघ्या एका धावेत धवन आणि पुजारा यांना गमावले.
- इंग्लंडने आपला दुसरा डाव ८ बाद ४२३ वर घोषित केला आहे. त्यामुळे भारतासमोर हा सामना जिंकण्यासाठी ४६४ धावांचे आव्हान आहे.
- सामन्याच्या चौथ्या दिवशी टी पर्यंत इंग्लंडचा स्कोर ६ बाद ३६४ असा आहे.
- शमीने बेरस्टोव आणि जडेजाने बटलरला झटपट माघारी पाठवले आहे.
- हनुमा विहारीने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमक दाखवली आहे. त्याने शतकवीर कूक आणि रूट यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद केले.
- सामन्यात लन्च ब्रेक झाला असून इंग्लंडची परिस्थिती २४३ वर दोन बाद अशी असून, कूक १०३ आणि रुट ९२ धावांवर खेळत आहे.
- आपला शेवटचा सामना खेळत असलेल्या कूकने आपले शतक पूर्ण केले असून तो १०१ धावांवर खेळत आहे तर कर्णधार रूट ८० धावांवर खेळत आहे.
- दुसऱ्या डावातही कूकने अर्धशतक पूर्ण केले असून तो सध्या ५६ धावांवर खेळत आहे.
- भारताचा पहिला डाव २९२ धावांवर संपल्यानंतर आता इंग्लंड आपला दुसरा डाव खेळत आहे. सध्या इंग्लंडची अवस्था १२६ वर दोन बाद अशी आहे.
- हनुमा विहारी ५६ धावांवर बाद झाल्यानंतर सध्या लन्च ब्रेक झाला असून भारताकडून रविंद्र जडेजा आणि इशांत शर्मा बॅटिंग करत आहेत. भारताची परिस्थिती २४० वर ७ बाद आहे.
- आपला पहिलाच सामना खेळणाऱ्या हनुमा विहारीने आपले अर्धशतक पूर्ण केले असून भारताची परिस्थिती ७६ ओव्हरनंतर २३७ वर ६ बाद आहे.
- ६४ ओव्हरनंतर भारताच्या २०० धावा पूर्ण झाल्या असून भारताची स्थिती सध्या २०४ वर ६ बाद आहे.
- भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटीचा तिसरा दिवस पुन्हा सुरू झाला असून सध्या भारत बॅटिंग करत आहे. भारताची परिस्थिती १७७ वर ६ बाद असून हनुमा विहारी २६ तर रविंद्र जडेजा १० धावांवर खेळत आहे.
- भारताने राहुलच्या रूपात दुसरी विकेट गमावली आहे. ३७ धावांवर करनने त्याला बाद केले.
- धवनला लवकर गमावल्यानंतर पुजारा आणि राहुल या जोडीने भारताचा डाव सावरला.
- भारताचा सलामीवीर पुन्हा एकदा स्वस्तात माघारी परतला आहे. त्याला ३ धावांवर ब्रॉडने बाद केले.
- इंग्लंडने पहिल्या डावात ३३२ इतकी मजल मारली. इंग्लंडकडून बटलरने सर्वाधिक ८९ धावा केल्या. तर भारताकडून जडेजाने घेतल्या ४ विकेट्स.
- दुसऱ्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडचा स्कोर ८ बाद ३०४, बटलर आणि ब्रॉड जोडीने ९० धावांची भागीदारी केली.
- दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच बुमराहने रशीदला माघारी पाठवले आहे.
- पहिल्या दिवसाअखेर इंग्लंडचा स्कोर ७ बाद १९८ असून बटलर आणि रशीद नाबाद आहेत.
- इंग्लंडकडून मालिकेत अप्रतिम कामगिरी केलेला सॅम यावेळी शून्यावर बाद झाला असून, इशांतने त्याची विकेट घेतली आहे.
- इंग्लंडचा मोईन अली अर्धशतक करून बाद झाला आहे, इशांतच्या बॉलिंगवर पंतने त्याचा झेल घेतला आहे.
- रविंद्र जडेजाने इंग्लंडच्या बेन स्टोक्सला बाद करत भारताला ५वे यश मिळवून दिले आहे.
- इंग्लंडचा विकेटकिपर जॉनी बेरस्टोवचा देखील बाद झाला असून इशांतच्या बॉलिंगवर पंतने त्याचा झेल घेतला आहे.
- इंग्लंडचा कर्णधार जो रूटलाही बूमराहने पायचीत बाद केले असून सध्या इंग्लंडची परिस्थिती १३४ वर ३ बाद आहे.
- इंग्लंडचा सलामीवीर अॅलेस्टर कूकला बुमराहमने बाद केले असून कूक ७१ धावांवर बाद झाला आहे.
- सध्या कूक आणि मोईन अली मैदानात आहेत
- सध्या सामन्यात टी-ब्रेक झाला असून ५९ ओव्हरनंतर इंग्लंड १२३ वर १ बाद अशी आहे.
- आपला अखेरचा सामना खेळत असलेल्या अॅलेस्टर कूकने आपले अर्धशतक पूर्ण केले असून ४७ ओव्हरनंतर इंग्लंडची परिस्थिती सध्या १०६ वर एक बाद आहे.
- लंच ब्रेक पर्यंत इंग्लंड १ बाद ६८ असून सध्या कूक आणि मोईन अली मैदानात आहेत.
- भारताच्या रविंद्र जडेजाने इंग्लंडचा सलामीवीर जेनिंग्जला बाद केले आहे. जडेजाच्या बॉलिंगवर के एल राहुलने झेल पकडला आहे.
- २० ओव्हरनंतर इंग्लंडचा स्कोर ५६ वर एकही बाद नाही.
- इंग्लंडने नाणेफेक जिंकत, सामन्यात बॅटिंग घेतली आहे.
- Advertisement -
आजच्या सामन्याच भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल असून हार्दीक पांड्याच्या जागी विहारीला संधी देण्यात आली आहे.
- Advertisement -
इंग्लंडचा सलामीवीर अॅलेस्टर कूकचा हा कारकिर्दीतील शेवटचा सामना असून त्याच्या चाहत्यांनी सामना पाहायला गर्दी केली आहे.