घरक्रीडाभारताला हरवल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करीन; पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेच्या संघाकडे अजब मागणी

भारताला हरवल्यास झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करीन; पाकिस्तानी अभिनेत्रीची झिम्बाब्वेच्या संघाकडे अजब मागणी

Subscribe

भारतीय संघ T20 विश्वचषकतील उपांत्य फेरी गाठण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 विश्वचषकाच्या ब गटातील अखेरचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश पोहचणार आहे.

भारतीय संघ T20 विश्वचषकतील उपांत्य फेरी गाठण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 विश्वचषकाच्या ब गटातील अखेरचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यास भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश पोहचणार आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारताला हरवावे अशी मागणी एका पाकिस्तानी अभिनेत्री झिम्बाब्वेच्या संघाकडे केली. एवढेच नाही तर, झिम्बाब्वेने भारताचा परभाव केल्यास मी झिम्बाब्वेतील मुलाशी लग्न करेन, असेही तिने म्हटले. अभिनेत्री सहार शिनवारी असे या अभिनेत्रीचे नाव आहे. त्यामुळे सहार शिनवारीच्या लग्नाच्या मागणीनंतर झिम्बाब्वेचा संघ भारताचा पराभव करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (ind vs zim pakistani actress sehar shinwari promises to marry zimbabwean guy if they beat india in t20 world cup)

पाकिस्तानी अभिनेत्री सहार शिनवारी हिने ट्विट करत भारताला हरवण्याची मागणी झिम्बाब्वेच्या संघाकडे केली आहे. “पुढच्या सामन्यात जर त्याच्या संघाने भारताला चमत्कारिकरित्या हरवले तर मी झिम्बाब्वेच्या मुलाशी लग्न करेन”, असे सहार शिनवारी हिने ट्विट केले. सहारा शिनवारी हीचे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. शिवाय, तिच्या या ट्विटनंतर अनेक क्रिकेटप्रेमींनी तिला ट्रोलही केले आहे.

- Advertisement -

अभिनेत्री सहार शिनवारी हिच्या या ट्विटवर अनेकांनी उत्तर दिली आहेत, एका युझरने असे लिहिले की, प्रसिद्धी मिळवण्यासाठी ही एक युक्ती आहे. त्यानंतर एका युजरने लिहिले की, तुम्ही पाकिस्तानी लोकांच्या ताब्यात काहीही नाही, तुम्ही सगळे खोटे आणि खोटे आहात. तसेच, आणखी एका युजरने लिहिले की, या ट्विटनंतर जे झिम्बाब्वेचे नागरिकत्व मिळवण्यासाठी झगडत आहेत, कृपया त्यांच्यावर आत्ता विश्वास ठेवू नका, अशाप्रकारचे अनेक ट्विट करत तिला क्रिकेटप्रेमींनी ट्रोल केले आहे.

भारतीय संघाचा टी-20 विश्वचशकातील अखेरचा सामना 6 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. भारतीय संघ सध्या ब गटात 6 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. तसेच, झिम्बाब्वेचा संघ 5 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. भारताने झिम्बाब्वेवर मात केल्यास त्यांचे 8 गुण होतील आणि उपांत्य फेरी गाठेल.

- Advertisement -

हेही वाचा – T20 World Cup 2022: पाकिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर 33 धावांनी विजय

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -