तेज चौकडीच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. तसेच हा भारताचा क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवरील तिसरा कसोटी विजय ठरला. भारताने हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडपुढे २७२ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १२० धावांत आटोपला. इंग्लंडकडून कर्णधार जो रूट (३३) आणि जॉस बटलर (२५) यांनी काही काळ चांगली फलंदाजी केली. परंतु, त्यांना इतरांची फारशी साथ लाभली नाही. भारताकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक चार, बुमराहने तीन, ईशांत शर्माने दोन, तर मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.
India win 👏
A sensational performance on day five helps them go 1-0 up in the five-match series!#WTC23 | #ENGvIND | https://t.co/rhWT865o91 pic.twitter.com/fOxpZ3s8j9
— ICC (@ICC) August 16, 2021
पहिल्या डावात राहुलचे शतक
त्याआधी या सामन्यात भारताने पहिल्या डावात लोकेश राहुलच्या (१२९) शतकामुळे ३६४ धावांची मजल मारली होती. याचे उत्तर देताना इंग्लंडने ३९१ धावा करताना पहिल्या डावात २७ धावांची आघाडी घेतली होती. कर्णधार रूटने नाबाद १८० धावांची उत्कृष्ट खेळी केली. भारताने दुसरा डाव ८ बाद २९८ धावांवर घोषित केला.
शमी, बुमराहची उत्कृष्ट फलंदाजी
पाचव्या दिवशी भारताकडून शमी (नाबाद ५६) आणि बुमराह (नाबाद ३४) या तळाच्या फलंदाजांनी अप्रतिम खेळ केला. त्यांनी नवव्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या होत्या. ही इंग्लंडविरुद्ध नवव्या विकेटसाठी भारताची विक्रमी भागीदारी ठरली. त्यामुळे भारताने चौथ्या डावात इंग्लंडपुढे २७२ धावांचे आव्हान ठेवले, जे इंग्लंडला पेलवले नाही. भारताच्या सिराजने दोन्ही डावांत चार-चार विकेट घेतल्या.
हेही वाचा – विराट कोहलीच्या फलंदाजीवर गावस्करांची टीका, म्हणाले…