धर्मशाला येथे आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणारा पहिला टी-२ सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. धर्मशाळामध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस पडत होता. त्यातच हवामानखात्याने रविवारीही पावसाची शक्यता वर्तवली होती आणि तसेच झाले. या मैदानावर पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असल्याने सामना उशिरा तरी सुरु होईल अशी आशा होती. मात्र, पावसामुळे नाणेफेक होण्याआधीच हा सामना रद्द करावा लागला. आता तीन सामन्यांच्या या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मोहालीत १८ सप्टेंबर रोजी होणार आहे.
The rains continue and the match has officially been called off. See you in Chandigarh for the 2nd T20I #INDvSA pic.twitter.com/BjZ9Y7QAf2
— BCCI (@BCCI) September 15, 2019
- Advertisement -