कुलदीप यादवने किमार रोचला बाद करत भारताला विजय मिळवून दिला. भारताने हा सामना २२४ धावांनी जिंकला आहे.
That’s that from Mumbai.
A huge win for #TeamIndia as they win by 224 runs with the series now at 2-1.#INDvWI pic.twitter.com/uzwQ77gpjM
— BCCI (@BCCI) October 29, 2018
कर्णधार जेसन होल्डरने एकहाती झुंज देत अर्धशतक झळकावले आहे.
खलील अहमद आणि कुलदीप यादवच्या चांगल्या गोलंदाजीपुढे वेस्ट इंडिजचे फलंदाज झटपट माघारी परतले आहेत.
खलील अहमदने शिमरॉन हेटमायर आणि रोवमन पॉवेल यांना झटपट माघारी पाठवले आहे. त्यामुळे ३७८ धावांचा पाठलाग करणाऱ्या विंडीजचा अर्धा संघ माघारी परतला आहे.
३७८ धावांचा पाठलाग करताना विंडीजची अडखळती सुरुवात झाली आहे. सलामीवीर चंद्रपॉल हेमराज, शाई होप आणि किरन पॉवेल झटपट माघारी परतले आहेत.
अखेरच्या काही षटकांत धोनी, केदार जाधव आणि जडेजाने फटकेबाजी करत भारताचा स्कोर ३७७ पर्यंत नेला.
Innings Break!#TeamIndia post a formidable total of 377/5 for the Windies to chase (Rohit 162, Rayudu 100)#INDvWI pic.twitter.com/Fqa6vaQvyr
— BCCI (@BCCI) October 29, 2018
शतक पूर्ण झल्यावर अंबाती रायडू रनआऊट झाला आहे. त्याला फेबिअन अॅलनने बाद केले.
रायडूचे कारकिर्दीतील तिसरे शतक पूर्ण. त्याने अवघ्या ८० चेंडूंत हे शतक पूर्ण केले.
Congratulations to @RayuduAmbati for his third ODI century, off 80 balls! ? #INDvWI pic.twitter.com/8ATyaLJt41
— ICC (@ICC) October 29, 2018
१६२ धावा करून रोहित बाद झाला. त्याला नर्सने बाद केले
रोहितने कारकिर्दीत सातव्यांदा १५० ची धावसंख्या पार केली आहे.
रायडूने मालिकेतील दुसरे अर्धशतक केले आहे.
रोहित शर्माने आपल्या कारकिर्दीतील २१ वे शतक शतक झळकावले आहे. हे शतक त्याने ९८ चेंडूंत पूर्ण केले.
ODI century number 21 for @ImRo45! ? ?
The hitman gets his second hundred of the series, off 98 balls! #INDvWI pic.twitter.com/q2Tf4bpc3R
— ICC (@ICC) October 29, 2018
रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण.
FIFTY!
Here comes the 37th half-century for @ImRo45 ?? pic.twitter.com/8W8SFKUXwI
— BCCI (@BCCI) October 29, 2018
कर्णधार कोहली या मालिकेत पहिल्यांदाच शतक न मारता बाद झाला आहे. त्याला किमार रोचने १६ धावांवर बाद केले.
३८ धावा करून शिखर धवन बाद झाला आहे.
भारतीय सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आहे. ८ षटकांत भारताच्या ५० धावा पूर्ण.
भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रिषभ पंतच्या जागी केदार जाधव आणि चहालच्या जागी जडेजाला संघात स्थान मिळाले आहे.
भारतीय संघात दोन बदल करण्यात आले आहेत. रिषभ पंतच्या जागी केदार जाधव आणि चहालच्या जागी जडेजाला संघात स्थान मिळाले आहे.
चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.