घरक्रीडाIPL 2021 : मुंबई इंडियन्सवरील विजयाचे श्रेय गोलंदाजांना - रिषभ पंत

IPL 2021 : मुंबई इंडियन्सवरील विजयाचे श्रेय गोलंदाजांना – रिषभ पंत

Subscribe

मिश्राने चार विकेट घेत मुंबईला अडचणीत टाकले. त्याला इतरांचीही उत्तम साथ लाभली.

लेगस्पिनर अमित मिश्रासह सर्वच गोलंदाजांच्या चांगल्या कामगिरीमुळे आम्हाला मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवणे शक्य झाले, असे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत मुंबईवरील विजयानंतर म्हणाला. मंगळवारी चेन्नईत झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सामन्यात दिल्लीने मुंबईला ६ विकेट राखून पराभूत केले. या सामन्यात मुंबईने चांगली सुरुवात केली होती, पण दिल्लीने त्यांना केवळ ९ बाद १३७ धावांवर रोखले. मिश्राने चार विकेट घेत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. त्याला इतरांचीही उत्तम साथ लाभली. त्यामुळे कर्णधार पंतने या विजयाचे श्रेय गोलंदाजांना दिले.

केवळ १३७ धावांवर रोखणे कौतुकास्पद

मुंबईच्या डावाची चांगली सुरुवात झाली होती. त्यामुळे आमच्यावर थोडे दडपण होते. मात्र, मिश्राच्या भेदक माऱ्यामुळे आम्ही सामन्यात पुनरागमन करू शकलो. मुंबईने ज्याप्रकारे सुरुवात केली होती ते पाहता, त्यांना केवळ १३७ धावांवर रोखणे कौतुकास्पद होते. आमच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळेच आम्ही विजय मिळवू शकलो, असे पंत म्हणाला. मिश्राने चार षटकांत २४ धावांत ४ विकेट घेतल्या. मुंबईविरुद्ध दिल्लीच्या गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, किरॉन पोलार्ड आणि ईशान किशन या मुंबईच्या प्रमुख फलंदाजांना माघारी पाठवले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -