घरक्रीडा१९ सप्टेंबरपासून रंगणार IPLचा रणसंग्राम

१९ सप्टेंबरपासून रंगणार IPLचा रणसंग्राम

Subscribe

गव्हर्निंग काऊन्सिल अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची माहिती

कोरोनामुळे लांबणीवर गेलेल्या आयपीएलच्या आगामी तेराव्या हंगामाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआय अंतिम निर्णयापर्यंत पोहचलं आहे. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार असून ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. याबाबतची माहिती आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिली. स्पर्धेच्या आयोजनात कोणताही बदल करण्यात आलेला नसून, बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल प्राथमिक कल्पना देऊन ठेवलेली आहे, असं बोललं जात आहे.

येत्या १९ सप्टेंबरला स्पर्धेला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर ८ नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाईल. ५१ दिवस आयपीएलचा रणसंग्राम रंगणार आहे. ५१ दिवसांचा हा कालावधी सर्व संघमालक, ब्रॉडकास्टर्स आणि इतर सदस्यांसाठीही योग्य आहे, अशी माहिती ब्रिजेश पटेल यांनी पीटीआयला दिली आहे. काही दिवसांपूर्वी आयसीसीने ऑस्ट्रेलियात प्रस्तावित टी-२० विश्वचषकाचं आयोजन वर्षभरासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बीसीसीआयकडून आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला.

- Advertisement -

याआधी २६ सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. युएईवरुन भारतीय संघ थेट ऑस्ट्रेलिया दौऱ्याला रवाना होणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आयसीसीच्या नियमांप्रमाणे १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करण्यासाठी आयपीएल स्पर्धा लवकर सुरु करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या वेळापत्रकावर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी बीसीसीआयने हे पाऊल उचलल्याचं कळतंय. प्रत्येक संघाला सरावासाठी किमान एका महिन्याची गरज असल्यामुळे २० ऑगस्टला संघ युएईसाठी रवाना होतील. त्यानंतर सर्व खेळाडूंना सरावासाठी किमान ४ आठवडे मिळणार आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -