आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्सने पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. सलग आठ पराभवानंतर पहिला विजय नोंदवणारा मुंबई इंडियन्सचा संघ ठरला आहे. मात्र, या विजयानंतर मुंबई इंडियन्सचा वेगवान फलंदाज इशान किशनने मोठं वक्तव्य केलं आहे.
त्यांच्या संघासाठी आणि सर्व खेळाडूंसाठी हा कठीण टप्पा आहे. अशावेळी सर्वांना एकत्र उभे राहण्याची गरज आहे, असं इशान किशान म्हणाला. मुंबई इंडियन्स आयपीएल २०२२ च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबईचा संघ गुणतालिकेत १० व्या स्थानावर आहे. मुंबईने शनिवारी राजस्थानचा ५ विकेट राखून पराभव केला.
सामना संपल्यानंतर किशनने प्रसार माध्यमांशी संवाध साधला. त्यावेळी तो म्हणाला की, आमच्यासाठी ही सोपी वेळ नसून आम्हाला एकमेकांना साथ द्यायची आहे. तुम्हाला तुमच्या तयारीवर लक्ष केंद्रित करावे लागेल. आज आम्ही जिंकू शकलो याचा मला आनंद आहे. क्रिकेटमध्ये हे सर्व काही घडत आहे. सर्व फलंदाज फिनिशरची भूमिका बजावण्याच्या आवेशाने मैदानात उतरले. आगामी काळात आम्ही आणखी सामने जिंकू, अशी आशा आहे, असं इशान किशन म्हणाला.
मुंबई इंडियन्सच्या ४४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने १५८ धावांचे आव्हान पूर्ण केले आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादवला उत्कृष्ट फलंदाजीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅचसाठी निवड करण्यात आली.
हेही वाचा : वीर दौडले सात…महेश मांजरेकरांकडून महाराष्ट्र दिनी नव्या चित्रपटाची घोषणा