घरक्रीडापर्थ कसोटी : विजयासाठी भारताला हव्यात २८७ धावा

पर्थ कसोटी : विजयासाठी भारताला हव्यात २८७ धावा

Subscribe

पर्थ कसोटीमध्ये भारताला विजयासाठी २८७ धावांची गरज आहे.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताला २८७ धावांची गरज आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ३२६ धावांवर आटोपला. नॅथन लॉयनने घेतलेल्या ५ बळींच्या जोरावर भारताचा पहिला डाव २८३ धावांवर आटोपला. पहिल्या डावामध्ये २८३ धावा केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियाकडे १७५ धावांची निर्णायक आघाडी होती. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे वगळता भारताकडून एकही फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर उभा राहू शकला नाही. आजचा चौथा दिवस असून भारताला विजयासाठी २८७ धावांची गरज आहे. दरम्यान, दुसऱ्या डावाच्या सुरूवातीला भारताला दोन धक्का बसले असून चेतेश्वर पुजारा अवघ्या ४ धावा करून माघारी परतला आहे. तर के. एल राहुल देखील माघारी परतला आहे. दरम्यान, मालिकेमध्ये पहिली कसोटी जिंकत भारत १-०नं आघाडीवर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -