आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामातील उद्या (सोमवार) सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. केकेआरच्या संघाने नऊ सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत. तर सहा सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सचा संघ आहे. यामध्ये राजस्थान संघाने आतापर्यंत नऊ सामन्यांपैकी सहा सामने जिंकले आहेत. त्यामुळे केकेआरसाठी हा सामना जिंकणं खूप महत्वाचं ठरणार आहे.
राजस्थान रॉयल्सला मुंबई इंडियन्सविरूद्धच्या शेवटच्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंबईसमोर १५९ धावांचे लक्ष होते. तसेच त्यांनी १९.२ ओव्हर्सपणे १५९ धावा पूर्ण केल्या होत्या. त्यांच्याकडून सूर्यकुमार यादवने ५१ आणि टिळक वर्माने ३५ धावा केल्या होत्या. मुंबईमधून सूर्यकुमारला तिसऱ्या क्रमांकावर उतरवण्यात आले होते. त्यामुळे त्याचा फायदा मुंबईच्या संघाला झाला होता.
कुलदीप यादवची अप्रतिम गोलंदाजी आणि मुस्तफिजूर रहमानच्या सुरेख गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्सचा चार विकेट राखून दणदणीत पराभव केला आणि सामना पुन्हा जिंकला. नितीश राणाच्या ३४ चेंडूत ५७ धावा करुन केकेआरला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यावर ९ बाद १४६ धावा करता आल्या. केकेआरला सलग पाच वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे.
राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना उद्या २ मे रोजी होणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता यांच्यामध्ये सामन्यासाठी नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होईल. सामन्याच्या पहिल्या डावाला साडेसात वाजता सुरुवात होणार आहे.
हेही वाचा : IPL 2022 : मुंबई इंडियन्सच्या सामन्यातील पहिल्या विजयानंतर इशान किशनचं मोठं वक्तव्य, म्हणाला…