घरक्रीडा९५ धावांवर असताना रोहीत शर्मा पावसाला म्हणाला, 'जा रे जा रे पावसा'!

९५ धावांवर असताना रोहीत शर्मा पावसाला म्हणाला, ‘जा रे जा रे पावसा’!

Subscribe

दोन कसोटी सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना खिशात घालून मालिकेच निर्भेळ यश मिळवण्याच्या उद्देशानं मैदानात उतरली आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. मयांक अगरवाल अवघ्या १० धावांवर बाद झाला. चेतेश्वर पुजारा खातंही न उघडता माघारी परतला, तर कर्णधार विराट कोहली १२ धावांवर तंबूत परतला. मात्र, त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेसोबत सलग तिसरं शतक ठोकणाऱ्या रोहीत शर्माने १०० धावांची नाबाद भागीदारी करून भारताचा डाव सावरला. मात्र, यावेळी घडलेल्या एका किश्श्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

..आणि रोहीत शर्मानं आभाळाकडे पाहिलं!

रोहित शर्मा वैयक्तीक ९५ धावांवर असताना अचानक मैदानात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. पाऊस वाढला असता, तर खेळ बंद करावा लागला असता आणि रोहीत शर्माचं शतक अधिक लांबलं असतं. त्यामुळे रोहीत शर्मानं वर पाहून पावसालाच ‘Not Now, Not Now’ अर्थात ‘आत्ता नको’ अशी विनंती केली. त्याच्या चेहऱ्यावर पडणाऱ्या पावसामुळे वैताग स्पष्ट दिसत होता. शतकासाठी अजून थांबण्याची त्याची अजिबात इच्छा नव्हती. अखेर, पुढच्या चेंडूवर त्याला स्ट्राईक मिळाली आणि त्याच चेंडूवर त्यानं अजून वाट न पाहाता सरळ षटकार ठोकत आपलं शतक साजरं केलं.

- Advertisement -

रोहीत शर्मानं या शतकासह कसोटी क्रिकेटमध्ये २ हजार धावांचा पल्ला पार केला. त्यासोबतच एकाच कसोटी मालिकेमध्ये ३ शतकं झळकावणारा रोहीत शर्मा हा दुसरा भारतीय सलामीवीर ठरला आहे. याआधी सुनील गावस्कर यांनी असा विक्रम केला होता. आज दिवसअखेर रोहीत शर्माच्या नाबाद ११७ धावांच्या जोरावर भारतानं ३ बाद २२४ धावांपर्यंत मजल मारली आहे. यामध्ये अजिंक्य रहाणेच्या नाबाद ८३ धावांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -