घरक्रीडाकर्णधार रोहितला दुखापत; भारताला टी-२० मालिकेआधी धक्का!

कर्णधार रोहितला दुखापत; भारताला टी-२० मालिकेआधी धक्का!

Subscribe

भारत आणि बांगलादेश यांच्यातील टी-२० मालिकेला रविवारपासून सुरुवात होणार आहे. मात्र, ही मालिका सुरु होण्याआधीच भारताला मोठा धक्का बसला आहे. शुक्रवारी सराव सत्रादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या डाव्या मांडीला चेंडू लागला. त्यामुळे त्याला सराव सत्र अर्ध्यातच सोडावे लागले. ही दुखापत किती गंभीर आहे, हे अजून कळलेले नाही. मात्र, त्याला या दुखापतीमुळे पहिल्या टी-२० सामन्याला मुकावे लागल्यास भारताला मोठा धक्का बसेल. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

शुक्रवारी नेट्समध्ये सराव करताना एक चेंडू रोहितच्या डाव्या मांडीला लागला. त्यानंतर त्याने लगेचच नेट्स सोडून जाण्याचा निर्णय घेतला. तसेच चेंडू ज्या वेगाने फेकला जात होता, त्याबाबतही त्याने नाराजी व्यक्त केली. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत भारतीय फलंदाजांना डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्ताफिझूर रेहमानचा सामना करावा लागणार आहे.

- Advertisement -

त्याच्याविरुद्ध खेळण्याचा सराव व्हावा यासाठी भारतीय संघाने श्रीलंकेवरून एका विशेष डावखुऱ्या गोलंदाजाला बोलावले आहे. त्यानेच फेकलेला एक चेंडू रोहितच्या मांडीला लागला. त्यानंतर लगेचच रोहितला झालेल्या दुखापतीवर वैद्यकीय टीम उपचार करत होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -