घरक्रीडाVijay Hazare Trophy : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी सुरु; मुंबईचा विजयी चौकार 

Vijay Hazare Trophy : श्रेयस अय्यरची दमदार कामगिरी सुरु; मुंबईचा विजयी चौकार 

Subscribe

अय्यरने या सामन्यात १०३ चेंडूत ११६ धावांची खेळी केली.

कर्णधार श्रेयस अय्यरने केलेल्या शतकाच्या जोरावर मुंबईने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या सामन्यात राजस्थानवर ६७ धावांनी मात केली. हा मुंबईचा या स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. अय्यरने या सामन्यात १०३ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११६ धावांची खेळी केली. हे त्याचे यंदाच्या स्पर्धेतील सलग दुसरे शतक ठरले. त्याने याआधी महाराष्ट्रविरुद्ध नाबाद १०३ धावांची खेळी केली होती. या दमदार कामगिरीमुळे त्याने आपण इंग्लंडविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार असून या मालिकेला १२ मार्चपासून सुरुवात होणार आहे.

शॉ-जैस्वालची चांगली सुरुवात

शनिवारी झालेल्या विजय हजारे स्पर्धेच्या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मागील सामन्यातील द्विशतकवीर पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल यांनी मुंबईच्या डावाची चांगली सुरुवात केली. या दोघांनी ७१ धावांची सलामी दिल्यावर शुभम शर्माने आधी पृथ्वी (३६) आणि मग जैस्वालला (३८) बाद केले. यानंतर अय्यरने अप्रतिम फलंदाजी करत शतक झळकावले. त्याला सर्फराज खान (३०) आणि सूर्यकुमार यादव (२९) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळे मुंबईने ५० षटकांत ७ बाद ३१७ अशी धावसंख्या उभारली.

- Advertisement -

शार्दूल ठाकूरच्या ४ विकेट

३१८ धावांचे उत्तर देताना राजस्थानची २ बाद ३२ अशी अवस्था होती. परंतु, मनेंदर सिंह (४०) आणि महिपाल लोमरर (४०) यांनी तिसऱ्या विकेटसाठी १०१ धावांची भागीदारी रचत राजस्थानचा डाव सावरला. यानंतरच्या फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करता न आल्याने राजस्थानचा डाव ४२.२ षटकांत २५० धावांत आटोपला. मुंबईकडून शार्दूल ठाकूरने ४ विकेट, तर धवल कुलकर्णीने ३ विकेट घेतल्या.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -