कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यातच कोरोनाने बायो-बबलमध्येही शिरका
आताच काहीही सांगणे अवघड
भारतातील सुविधा आणि यंत्रणांवर ताण येणार असेल किंवा खेळाडू आणि स्पर्धेशी निगडित लोकांच्या जीवाला कोणताही धोका असल्यास टी-२० वर्ल्डकपचे आयोजन भारतात होऊ शकत नाही. टी-२० वर्ल्डकपला अजून साधारण सहा महिने शिल्लक आहेत. त्यामुळे आताच काहीही सांगणे अवघड आहे. परंतु, क्रिकेट प्रशासकांनी भारत सरकारसोबत मिळून काम केले पाहिजे. भारतीय लोकांच्या हिताचाही विचार झाला पाहिजे, असे कमिन्स एका मुलाखतीत म्हणाला.
बीसीसीआयला दोष देणे चुकीचे
यंदा आयपीएल स्पर्धा भारतात आयोजित करण्यावरून बीसीसीआयवर बरीच टीका होत आहे. परंतु, त्यांनी सर्व अनुभवी लोकांचे सल्ले घेतल्यानंतरच भारतात आयपीएल स्पर्धा घेण्याचा विचार केला असणार आणि त्यांना दोष देणे चुकीचे ठरेल, असे कमिन्सने नमूद केले. तसेच लोक या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी का होईना, पण घरी थांबत होते. त्यामुळे ही स्पर्धा खेळवण्याचा निर्णय योग्यच होता, असे कमिन्सला वाटते. कमिन्स या स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता.