भारताचा माजी खेळाडू विराट कोहली सध्या त्याच्या खराब फलंदाजी पॅचमधून चालला आहे. विराटचे आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये शतक ७२ डावांपर्यंत वाढले आहेत. कोहली पुन्हा देशांतर्गत पिंक बॉल टेस्टमध्ये सुरुवातीच्या दिवशी २३ वर बाद झाल्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. यानंतर माजी भारतीय दिग्गज खेळाडू सुनील गावस्करने कोहलीला खराब प्रदर्शन पॅचमधून बाहेर येण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे.
बंगळुरू कसोटीतील पहिल्या दिवस संपल्यानंतर सुनील गावस्करने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी गावस्कर म्हणाले की, विराटने बॅकफूटवर विकेट-डिलीवरी खेळण्याची चुक पुन्हा केली आणि दीर्घकाळापासून तो तसेच करत आला आहे. त्याला माहिती होते की, चेंडूच्या प्रति आपल्या दृष्टिकोनासह संघर्ष करत होता.
विराटने जो शॉट खेळला तो त्याला खेळायला हवा होता तो शॉट नव्हता. पुन्हा मार्गक्रमण होते. पहिल्या कसोटीमध्ये एम्बुल्डेनियाविरुद्ध ज्या प्रकारे तो बॅकफूटवर गेला. यावेळी तो फ्रंट पॅडवर खेळला आहे. याचा अर्थ तो लढणारा होता. जर तो चुकला असता तर एलबीडब्ल्यू होणार होता. नेमके तेच झाले आणि त्याने अंपायरच्या निर्णयाची वाटसुद्धा पाहिली नाही. तो समोर असताना त्याच्या पॅडला चेंडू लागला त्यामुळे त्याने अंपायरच्या निर्णयाची वाट पाहिली नाही. त्याला रेषेच्या पुढे जाऊन खेळण्याची किंमत मोजावी लागली.
विराट कोहलीने शेवटचे शतक २०१९ मध्ये कोलकातामध्ये बांग्लादेशविरुद्ध झालेल्या पिंक डे कसोटीमध्ये केले होते. या कसोटीनंतर २९ डावांमध्ये कोहलीने ६ अर्थशतकांसह २८.५५ च्या सरासरीने ८२८ धावा केल्या आहेत.
सुनील गावस्करने विराटला धावसंख्या पुन्हा उभारण्यासाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. तुम्ही स्वतःशी जे संभाषण करत आहात, ते म्हणजे तुम्ही ज्या प्रकारचे शॉट्सला संपवण्यासाठी आहेत ज्यावर तुम्ही बाद होताय. तुम्ही संभाषण करण्याचा प्रयत्न करत आहात जिथे तुम्ही म्हणता की बॅटचा पूर्ण सहारा घेऊन खेळा. प्रयत्न असे करा की बॅड पॅचमधून बाहेर येण्याची संधी मिळेल असे प्रयत्न करा.
हेही वाचा : IPL 2022 : RCB ने डुप्लेसीला का दिली विराट कोहलीची जागा ?, फ्रॅंचायझी डायरेक्टरने केला खुलासा