इंदूर : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका जिंकली आहे. इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताने 99 धावांनी विजय मिळवला. या विजयामुळे भारताने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली.(Win over Australia in 2nd ODI too India bagged the three ODI series)
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांत पाच गडी गमावून 399 धावा केल्या. पावसामुळे ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार 33 षटकांत 317 धावांचे लक्ष्य मिळाले. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 28.2 षटकांत सर्वबाद 213 धावांच करू शकला.
मोहालीनंतर भारताना इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यातही भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. मोहालीनंतर आता दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. इंदूरमध्ये भारताचा हा सलग सातवा विजय आहे. 2006 मध्ये तो येथे प्रथमच एकदिवसीय सामना खेळला होता. येथे सात एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताला कधीही पराभवाचा सामना करावा लागला नाही. त्याचवेळी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा विजय मिळाला. 2017 मध्ये टीम इंडियाने कांगारूंचा पाच विकेट्सने पराभव केला होता.
That’s that from the 2nd ODI.
Jadeja cleans up Sean Abbott as Australia are all out for 217 runs in in 28.2 overs.#TeamIndia take an unassailable lead of 2-0.#INDvAUS pic.twitter.com/LawVWu2JI8
— BCCI (@BCCI) September 24, 2023
हेही वाचा : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : प्रज्ञा ठाकूरसह आरोपींना सोमवारी रहावे लागणार कोर्टात हजर
मंगळवारी खेळल्या जाणार तिसरा सामना
मालिकेतील विजयासोबतच भारताने यंदाच्या वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला आहे. ऑस्ट्रेलिया संघाने मार्चमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताचा 2-1 असा पराभव केला होता. दोन्ही संघांमधील सध्याच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना मंगळवारी (27 सप्टेंबर) राजकोटमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली, अष्टपैलू हार्दिक पंड्या यांच्यासह विश्वचषकासाठी निवडलेले सर्व खेळाडू या सामन्यात दिसणार आहेत.
हेही वाचा : Canada-India Crisis: कॅनडाचे एक पाऊल मागे; भारतविरोधी पोस्टर, बॅनर हटविण्याचे आदेश
असा झाला सामना
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने 50 षटकांत पाच गडी गमावून 399 धावा केल्या. पावसामुळे ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस नियमानुसार 33 षटकांत 317 धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र ऑस्ट्रेलियाचा संघ 28.2 षटकांत सर्वबाद 213 धावाच करु शकला.
कर्णधार स्टीव्ह स्मीथ शुन्यावर बाद
ऑस्ट्रेलियाकडून सीन अॅबॉटने 54 आणि डेव्हिड वॉर्नरने 53 धावा केल्या. मार्नस लॅबुशेनने 27 आणि जोश हेझलवूडने 23 धावा केल्या. कॅमेरून ग्रीनने 19 आणि अॅलेक्स कॅरीने 14 धावा केल्या. मॅथ्यू शॉर्ट नऊ धावा केल्यानंतर, जोश इंग्लिश सहा धावा केल्यानंतर आणि अॅडम झम्पा पाच धावा करून बाद झाला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ खातेही उघडू शकला नाही. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने किलर बॉलिंग केली. दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. प्रसिध कृष्णाला दोन आणि मोहम्मद शमीला एक विकेट मिळाली.