कोहलीला कर्णधारपदावरून हटवण्यात आले
विराट कोहलीच्या कर्णधारपदावर बोलताना लतीफ म्हणाला की, त्याला प्रत्येक सामना जिंकायचा होता, त्यामुळे तो त्या दिशेने काम करत होता. पण त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले. त्यानंतर भारतीय संघाला अंतर्गत वादामुळे चांगली कामगिरी करता येत नाही. याशिवाय कर्णधार म्हणून विराट कोहलीनेही आयसीसी स्पर्धेत चांगली केली नाही. कारण त्याला संघात जे खेळाडू हवे होते, ते त्याला मिळाले नाहीत.
भारतीय संघाला चौथ्या क्रमांकावर चांगला फलंदाज हवा
राशिद लतीफ म्हणाला की, पुढील काही दिवसांत दोन मोठ्या स्पर्धा पार पडणार आहेत. श्रीलंकेत आशिया कप आणि भारतात विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय संघात चांगले खेळाडू आहेत. हा संघ दोन्ही स्पर्धा जिंकून शकतो, पण त्याना नंबर 4 वर काम करावे लागणारे आहे. त्यांना चौथ्या क्रमांकावर एक चांगला फलंदाज हवा आहे, असे लतीफ म्हणाला.