घरक्रीडा...तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल रद्द !

…तर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होईल रद्द !

Subscribe

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, या सर्व चाहत्यांची निराशा होऊ शकते.

भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेला चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिका आणि नंतर ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने चांगली सुरुवात केली आहे. परंतु भारतातील क्रिकेट चाहत्यांचे संपूर्ण लक्ष भारत विरूद्ध पाकिस्तान या सामन्याकडे वेधलं गेलं आहे. विश्वचषकात भारतीय संघ पाकिस्तान विरुद्ध दमदार कामगिरी करत आला आहे. तसेच भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात चाहत्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते. मात्र, या सर्व चाहत्यांची निराशा होऊ शकते.

हवामान खात्याने या सामन्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने सांगितले आहे की, १६ जूनला ब्रिटेनमध्ये जास्त पाऊस पडू शकतो. यामुळे सर्वत्र निराशाजनक वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पावसामुळे विश्वचषक २०१९ स्पर्धेतील २ सामने रद्द झाला आहेत. पावसामुळे विश्वचषक स्पर्धेतील इतर सामनेही रद्द होण्याची शक्यता आहे. विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यात १६ जून रोजी सामना होणार आहे. भारत-पाकिस्तान यांच्या सामन्यावरही पावसाचे संकट आहे. सामना रद्द होऊ नये अशी अनेकजणं अपेक्षा करत आहेत.

- Advertisement -

भारताचे आतापर्यंत या विश्वचषक स्पर्धेत २ सामने झाले आहेत. या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर पाकिस्तानचे विश्वचषक २०१९ स्पर्धेत आतापर्यंत ३ सामने झाले आहेत. पाकिस्तानने ३ सामन्यापैंकी १ जिंकला, १ सामना गमावला आणि १ सामना पावसामुळे रद्द झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -