घरठाणेराष्ट्रीय लोकअदालतीत २४ हजार ७३ प्रलंबित प्रकरणे निघाली निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीत २४ हजार ७३ प्रलंबित प्रकरणे निघाली निकाली

Subscribe

  राज्यात ठाणे जिल्हा सलग तिसऱ्यांदा उच्चांकावर

 राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठाणे जिल्हा प्रलंबीत प्रकरणे निकाली काढण्यात राज्यात सलग तिसऱ्यांदा ठाणे जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ३० एप्रिल रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये एकूण २४ हजार ०७३ प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे निकाली काढून त्या प्रलंबित प्रकरणांत ७६ कोटी ०८ लाख ५१ हजार ६९१ इतक्या रक्कमेची तडजोड झाली आहे. तर दाखलपूर्व ६ हजार ६२५ प्रकरणे निकाली काढत  १२ कोटी ३३ हजार १७१ इतकी रक्कमेची तडजोड झाल्याने एकूण ३० हजार ६९८ प्रलंबित व दाखलपूर्व प्रकरणे निकाली निघाले. यामध्ये एकूण ८८ कोटी ०८ लाख ८४ हजार ८६२  इतक्या रक्कमेची तडजोड झाली आहे. विशेष म्हणजे या लोकअदालतीमध्ये तुरुंगात बंदी असलेल्या कैदयांच्या प्रलंबित प्रकरणांस प्राधान्य देण्यात आले. तसेच यामध्ये ई-फायलिंग प्रणालीचा यशस्वी प्रयोग करताना विनाकागदपत्रांची (पेपरलेस) ई-फायलिंग प्रकरणांमध्ये ई-व्हेरीफीकेशन करून एकूण ४६ प्रकरणे ई-निकाली काढण्यात यश आले आहे.
ठाणे जिल्हयात राष्ट्रीय लोकअदालतीस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.गेल्या  १० ते १५ वर्ष जुने असंख्य प्रकरणे निकाली निघत आहेत. तसेच वैवाहीक प्रकरणे तडजोडीस मोठया प्रमाणात यश आल्याने अनेक संसार जुळून ही आणण्याचे काम केले जात आहे.तर मोटार अपघातांच्या २३५ प्रकरणांमध्ये १८ कोटी ४७ हजार ५२८ रुपये नुकसान भरपाई मंजूर ही झालेली आहे. त्यापैकी ठाणे मुख्यालयात १६२ मोटार अपघात प्रकरणांत तडजोड होवुन रूपये १२ कोटी ०३ लाख ४३ हजार २२८ रुपये नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून यामध्ये जुन्या प्रकरणांचा समावेश आहे. कल्याण तालुका न्यायालयामध्ये २२ मोटार अपघात प्ररकणांमध्ये तडजोड होवुन रूपये १कोटी १८ हजार नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. दाखलपूर्व बॅक रिकव्हरीची एकूण १६७ प्रकरणे निकाली काढताना ७२ लाख ९५ हजार ४७५ इतक्या रकमेची तडजोडी झाली आहे. एन. आय. अॅक्ट कलम १३८ ची ११३० प्रलंबित प्रकरणे निकाली असून यामध्ये तडजोडीचा आकडा १५ कोटी ९५ लाख २५ हजार ६९३ इतका आहे. प्रॉपर्टी टॅक्स / रेव्हेन्यु ची दाखलपूर्व ३ हजार २७० प्रकरणे निकाली काढताना तडजोडीची रक्कम ३ कोटी १७ हजार ५४ हजार ८७० इतकी मंजूर केली गेली आहे.पाणीपट्टीची दाखलपूर्व १ हजार ३९८ प्रकरणात तडजोडीची ४१ लाख ३४ हजर ६१३ इतकी रक्कम आहे. याशिवाय लोकअदालतीमध्ये कारागृहातील न्यायाधीन बंदींपैकी जवळपास ५५ बंदयांची कारागृहातून सुटका झाली आहे. तसेच या लोकअदालतीमध्ये फौजदारी प्रकरणात ४३७ जणांनी न्यायालयासमोर गुन्हा कबूल केला आहे.तसेच दंडाची रक्कम ही जमा केली आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशानुसार ठाणे जिल्हा व सत्र न्यायालय, अंतर्गत ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्फत ठाणे आणि पालघर जिल्हयातील सर्व अति. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालये, कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय, सहकार न्यायालय व इतर न्यायालयांमध्ये ठाणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष अभय ज. मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार “राष्ट्रीय लोकअदालत” चे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकूण २४ हजार ००३ न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे निकाली झाली असून ६ हजार ६२५ दावा दाखल पूर्व प्रकरणे अशी मिळून एकूण ३० हजार ६९८ तडजोड पात्र असलेली प्रकरणांमध्ये पक्षकारांच्या सामंजस्याने तडजोड करुन निकाली झाली आहेत, अशी माहीती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली. राष्ट्रीय लोकअदालतमध्ये न्यायालयातील वाढता ताण लक्षात घेता प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे आवश्यक असून प्रलंबीत प्रकरणे निकाली काढल्याने पक्षकारांस तात्काळ न्याय मिळतो व न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा जलद गतीने निपटारा होतो, या आवाहनास पक्षकार, विधीज्ञ, शासकीय, निमशासकीय विभाग, बँक यांचे अधिकारी कर्मचारी यांचा प्रतिसाद मिळाला व प्रलंबीत २४ हजार ०७३ प्रकरणे निकाली निघाली अशी माहिती सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -