घरठाणेशीळफाट्यावर १३ गोडावून जळून खाक

शीळफाट्यावर १३ गोडावून जळून खाक

Subscribe

मुंब्रा – पनवेल रोडवरील शीळफाटा या ठिकाणी असलेल्या महाराष्ट्र कंपाउंडमधील तब्बल १३ गोडावूनला लागल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास लागली. अंदाजे सहा तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसली तरी गोडाऊन जळून खाक झाले आहेत. हे गोडावून रबर व चप्पल मटेरियल, प्लास्टिक बॉटल, पुठ्ठा, चिंधी आदी जुने साहित्याचे होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उशीर होत होता. तर या आगीचे कारण अद्यापही समोर आले नाही. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. मुंब्रा – पनवेल रोडवरील महाराष्ट्र कंपाउंड मध्ये जुने रबर व चप्पल मटेरियल, प्लास्टिक बॉटल, पुठ्ठा, चिंधी आदी साहित्य गोडावूनला आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी सहाय्यक आयुक्त (दिवा प्रभाग समिती), आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी व कार्यालयीन अधिक्षक तसेच टोरंट पॉवर कंपनीचे कर्मचारी, डायघर पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान व अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान यांनी धाव घेतली. लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कर्मचार्‍यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले. मात्र जुने साहित्य जमा करून ठेवल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण होत होते.

त्यातच रबर, प्लास्टिक असल्याने ती आग नियंत्रणात येण्यासाठी उशीर झाला. संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आगीवर नियंत्रणात मिळाले. पण त्या ठिकाणी कुलिंगचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यावेळी त्या परिसरात मोठया प्रमाणात धूर पसरला होता. तसेच त्या गोडावून मालकांची ओळख पुढे आली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ५ फायर वाहन व ५ वॉटर टँकर, ३ खाजगी वॉटर टँकर, १ रेसक्यू वाहन बोलविण्यात आले होते. ही गोदामे रबर व चप्पल मटेरियल, रबर शिट, प्लास्टिक बॉटल, लाकडे, कागद, डेकोरेशन मटेरियल, पुठ्ठा, मेडिसिन बॉटल, चिंधी , नमकिन आदी साहित्य होते.

- Advertisement -

उंबर्डे कचरा प्रक्रिया प्रकल्पाला आग
कल्याण । कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कल्याण पश्चिमेतील उंबर्डे कचरा प्रक्रिया प्रकल्पामधील कचर्‍याला दुपारच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे या परीसरात धुराचे लोट उठले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. दरम्यान या आगीच्या धुरामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे उंबर्डे गावातील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागला. हा प्रकल्प सुरवातीपासूनच वादात असून येथील ग्रामस्थांचा या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला विरोध आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -