घरठाणेपालकमंत्री शिष्टमंडळासह निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासाठी गेले होते का ?

पालकमंत्री शिष्टमंडळासह निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासाठी गेले होते का ?

Subscribe

आनंद परांजपे यांचा सवाल

एकिकडे महापौर नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदे घेऊन गृहनिर्माण मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले. ते होत नाही तोच काही तासात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेत,  महापालिकेने तयार केलेली प्रभाग रचना ही जशीच्या तशी ठेवावी, यासाठी प्रभाग रचना जाहीर होण्याच्या एक दिवस आधी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार, दोन आमदार, महापौर नरेश म्हस्के आणि काही नगरसेवक असे शिष्टमंडळ घेऊन निवडणूक आयोगावर दबाव टाकण्यासाठी गेले होते का ? असा सवाल राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. त्यातही म्हस्के यांना जर गोपनियता भंग झाले असे वाटत असेल तर त्यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्याचे धाडस दाखवावे असे परांजपे म्हटले.

राष्ट्रवादीला कोणताही जुना आराखडा मिळाला नव्हता असे स्पष्ट करून, त्यात काही तरी गडबड असल्याचे समजल्यानेच गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांनी पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले. तर प्रभाग रचना अंतिम करतांना त्याबाबत कोणत्याही प्रकारची बैठकही न होता ही प्रभाग रचना तयार कशी झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यातही प्रभाग रचनेत राष्ट्रवादीने हस्तक्षेप घेतलेला नाही, त्यामुळे त्यांना तसे वाटत असेल तर त्यांनी १४ तारखेला हरकत घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

त्यातही गोपनीयेतचा भंग झाला असेल तर आयुक्तांच्या विरोधात तक्रार करण्याचे धाडस महापौरांनी दाखवावे. तसेच आयुक्तांनी म्हस्के यांना प्रवक्ता नेमले आहे का? असा उलट सवाल केला आहे. पुढे बोलताना महापौरांनी आपली जात काढली तर आपण त्यांच्याबाबत कधीच अपशब्द काढले नाही. उलट त्यांचा उल्लेख आपण नेहमीच ठाण्याचे महापौर म्हणूनच करतो. अशाप्रकारे काही तासांच्या अंतरावर झालेल्या या आरोप-प्रत्यारोपावरून पुन्हा एकदा या दोन पक्षात वाद चिघळणार असे दिसत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -