घरठाणे"भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ठाणे महानगरपालिका", जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप

“भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ठाणे महानगरपालिका”, जितेंद्र आव्हाडांचे गंभीर आरोप

Subscribe

सगळ्या भागातील रस्ते चांगले आहेत फक्त त्याच्यावर नवीन डांबर टाकायचे आणि करोडो रुपयाची बिले काढायची. आणि ह्याच्यात खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांचेच हात आहेत. किती फसवणार आहेत ठाणेकरांना?" असा सवाल जितेंद्र आव्हाड केला आहे.

मुंबई | “भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ठाणे महानगरपालिका झाले आहे”, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्वीट करत ठाणे महापालिकेवर केला आहे. जितेंद्र आव्हाडांनी ठाणे, कळवा आणि मुंब्रा येथे ठाणे महानगरपालिकेची रस्त्यांच्या (Roads) काम सुरू आहे. या कामात ठाणे महानगरपालिकेच्या (Thane Municipal Corporation) खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांचेच हात आहे, असे म्हणत जितेंद्र आव्हाडांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “ठाणे, कळवा, मुंब्रा येथे ठाणे महानगरपालिकेची रस्त्याची कामे चालू आहेत. त्यासाठी खास निधी आणला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान शोधून काढले आहे. सगळ्या भागातील रस्ते चांगले आहेत फक्त त्याच्यावर नवीन डांबर टाकायचे आणि करोडो रुपयाची बिले काढायची. आणि ह्याच्यात खालपासून ते वरपर्यंत सगळ्यांचेच हात आहेत. किती फसवणार आहेत ठाणेकरांना?” असा सवाल त्यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “मी स्वतः हे लिहीत आहे. कोणाच्यात हिम्मत असेल तर माझ्यासोबत चला मी तुम्हांला दाखवतो कुठले रस्ते चांगले आहेत आणि कुठल्या रस्त्यावर डांबर टाकले आहे. भ्रष्टाचाराचे दुसरे नाव ठाणे महानगरपालिका झाले आहे.”

- Advertisement -

ठाणे महापालिका अधिकारी भस्मासूरासारखे वागतात

“आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे स्टँडिंग कमिटीला जास्तीत जास्त एक टक्का ते दिड टक्का घ्यायचे आता महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेट वाढवलेला आहे. आणि तोही किती तर ५ टक्के. आणि जोपर्यंत ५ टक्के (मी नावही जाहीर करेन) ज्या अधिकाऱ्याच्या हातात देत नाहीत तोपर्यंत फाईलवर सहीच होते नाही. बाहेर आल्यावर स्वतःला अतिशय पापभिरू अधिकारी म्हणून मिरवणारे केबिनमध्ये बसल्यावर रावणाचा अवतार धारण करतात आणि भस्मासूरासारखे वागतात”,असे आरोपही जितेंद्र आव्हाडांनी केले आहे.

- Advertisement -

“५ टक्के… आयुक्त तुम्ही तर विचार करा गरीब ठेकेदाराला ५ टक्के एकत्र द्यायला जमतात का? सगळीकडे काम बंद स्थितीत आहेत. लोक फाईल घ्यायला तयार नाहीत. एक टक्क्यावरच समाधान मानायला हव होतं. आपली तर भूक इतकी मोठी आहे की आपले सगळे अधिकारी ५ टक्के मागायला लागले आहेत. आज ना उद्या नवीन नंदलाल समिती बसवावी लागेल”, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -