अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर‎ करा

 धनगर समाजबांधवांची मागणी‎

अहिल्यादेवी होळकर

अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा यामागणीसाठी महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती (ठाणे) तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या‎ गावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी‎ होळकर यांचा जन्म झाला. सीना‎ नदी काठी वसलेल्या या गावात‎ धनगर समाजाचे दैवतांचा जन्म‎ झाल्याने ती भूमी पवित्र झाली आहे.त्यामुळे अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर करा या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला असून  राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  यांचे जन्मगाव चौंडी येथुन आहिल्या नगर नामांतरसाठी रथयात्रा काढण्यात आली होती.

संपूर्ण नगर जिल्ह्यातील गावात फिरुन जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन या रथयात्रेची सांगता नुकतीच झाली आहे.धनगर समाजाने केलेल्या या मागणीला महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती ठाणे यांच्या वतीने जाहीर पाठींबा देवुन ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांना ठाणे येथील पदाधिकारी निवेदन दिले. यावेळी ज्येष्ठ समाज सेवक पंडीत पितांबर परदेशी,अनिता हिलाल, युवा नेते देवा खताळ,अजय हाके, मंगलाताई कोळेकर, शंकर परदेशी, तुषार धायगुडे, युवराज परदेशी ,संदिप परदेशी,उत्तम यमगर आदी समाजबांधव उपस्थित होते. ज्या प्रमाणे उस्मानाबादचे धाराशीव व औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केले त्याच धर्तीवर अहमदनगरचे अहिल्यानगर नामांतर करावे अशी समस्त भारत देशातील धनगर समाजाची भावना आहे त्यांच्या भावनाचा आदर करुन नामांतर करावे अशी भावना यावेळी ज्ञानेश्वर परदेशी यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर व्यक्त केली.