घरठाणेठाण्यातील शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

ठाण्यातील शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद – जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर

Subscribe

इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ऑफलाईन बंद.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आता प्रत्यक्षात आल्यासारखे वातावरण असून त्यावर उपाय करण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून उद्यापासून जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीच्या सर्व माध्यमांच्या सर्व आस्थापनांच्या ऑफलाइन शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितले. ज्या नागरिकांनी अजूनही लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही त्यांनी तात्काळ आपले लसीकरण करून घ्यावे. सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटेशनचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी सांगितले की, मागील आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांची शंभरच्या जवळपास ठाणे जिल्ह्याची आकडेवारी होती ती आता प्रत्येक दिवशी जवळपास दोन हजार पर्यंत एवढी वाढली आहे. कोरोना संसर्ग हा झपाट्याने सगळीकडे वाढीला लागलेला आहे त्यावर उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

सर्व रुग्णालये, ऑक्सिजनची व्यवस्था, खाटांची उपलब्धता यासाठी जिल्हा प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय आणि थोडी सावधानता बाळगावी म्हणून उद्यापासून ठाणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील आणि ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावी या सर्व माध्यमांच्या सर्व आस्थापनांच्या ऑफलाइन शाळा बंद असतील. पूर्वीप्रमाणे या वर्गांचे ऑनलाइन शाळा सुरू राहतील. दहावी आणि बारावी यांचे ऑफलाइन वर्ग सुरू राहतील.

जे विद्यार्थी १५ ते १८ वयोगटातील आहेत ते जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून घेऊ शकतात. त्यांनी तातडीने आपले लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही नार्वेकर यांनी केले. तिसऱ्या लाटे पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण हे प्रभावी अस्त्र आपल्या असून ज्या नागरिकांनी अजूनही लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही त्यांनी तात्काळ आपले लसीकरण करून घ्यावे. ते एक सुरक्षा कवच आपल्याकडे आहे याचे भान राखून सोशल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटेशनचा वापर या त्रिसूत्रीचा अवलंब करून प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -