घरठाणेकोरोनावर मात करताच पाटलाचे नशीब उघडले;ठाण्यातील व्यावसायिकाला ५ कोटींची लॉटरी

कोरोनावर मात करताच पाटलाचे नशीब उघडले;ठाण्यातील व्यावसायिकाला ५ कोटींची लॉटरी

Subscribe

पाटील व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिक चांगली कामे करण्यासाठी जिंकलेली रक्कम गुंतवणार

कोरोना महामारीच्या काळात अनेकजणांना आर्थिकदृष्ट्या फटका बसला आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील दिवा भागात राहणाऱ्या एका कुटुंबाचे नशिब उलघडलेआहे. राजकांत पाटील या व्यापारी आणि लघु व्यावसायिकाने डियर लॉटरीज बैसाखी बंपर २०२१ ड्रॉ जिंकत तब्बल 5 कोटी रुपयांची रक्कम जिंकलीआहे. विशेष म्हणजे पाटील नुकतेच कोरोनावरील उपचार घेऊन घरी आले होते. प्रत्येक व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असते. त्यासाठी दिवसरात्र मेहनत घेण्याचीही प्रत्येकाची तयारी असते. तरीही ध्येय गाठायला वेळ लागतो. विशेषत: गेल्या वर्षभरापासून अनेकांच्या स्वप्नाचा अक्षरशः चुराडा झाला आहे.

 

- Advertisement -

या कोरोनाच्या संकटाच्या काळात लोकांना आपल्या हातात आहे तेही गमावण्याची भीती आहे. त्यातच भविष्याची चिंता असल्यामुळे सर्वांच्याच मनात सतत धाकधूक सुरु आहे. अशा कठीण काळात डियर लॉटरीने पाटील यांच्या विश्वासाला पुन्हा उभारी देत आयुष्यात सकारात्मकता निर्माण केली. कोरोना महामारीला सुरुवात झाल्याबरोबर संपूर्ण जग ऑनलाईन शॉपिंगकडे वळले आहे. जीवनावश्यक वस्तूही ग्राहकांना घरपोच मिळू लागल्या. डियर लॉटरीने घोषणा केली की ते आपल्या ग्राहकांना घरपोच लॉटरी तिकिट्स पोहोचवण्याची सेवा देऊन ही नवीन जीवनशैली अंगीकारतील.

ग्राहकांची संख्या वाढली आणि जबरदस्त कॅश प्राईजेस घरबसल्या, कोणत्याही त्रासाविना सहज जिंकण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली. राजकांत पाटील ठाण्याजवळच्या दिवा भागात आपली पत्नी, आई आणि दोन मुलांसोबत राहतात. त्यांना जेव्हा लॉटरीविषयी समजलं, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. “मला स्वत:ला कोरोना विषाणूची लागण झाली होती आणि मी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होतो. यातून पूर्णपणे बरा झाल्यावर, जेव्हा मी घरी परतलो तेव्हा मला डियर लॉटरीकडून त्यांच्याशी संपर्क साधण्याविषयी एक मेसेज आला. काही कारणास्तव मी जरा गोंधळलो कारण मी कित्येक दिवस आजारी होतो आणि हा मेसेज नेमका कशा संदर्भात आहे ते मला कळत नव्हते. पण अखेर मी त्यांच्याशी संपर्क साधला” असं राजकांत यांनी सांगितलं.

- Advertisement -

यावेळी बोलताना पाटील म्हणाले की मली एक फोन आला आणी ‘नमस्कार पाटील साहेब. तुम्ही डियर लॉटरी टीमच्या इतर २५ सदस्यांसह कॉन्फरन्स कॉलवर आहात आणि आम्ही तुमचे अभिनंदन करतो कारण तुम्ही 5 कोटी रुपये जिंकलेले आहात’ असं त्यांनी फोनवर सांगताच काही क्षण मी गांगरलो आणि हे खरंच घडलं आहे याची जाणीव झाल्यावर आनंदाने तोंडातून शब्द फुटत नव्हते” अशी प्रतिक्रिया डियर लॉटरीज बैसाखी बंपर २०२१ चे मानकरी ठरलेल्या राजकांत पाटील यांनी दिली. या लॉटरी तिकिटांची किंमत अवघ्या सहा रुपयांपासून सुरु होते. समाजातील प्रत्येक व्यक्ती यामध्ये सहभागी व्हावा हाच या मागचा हेतू असल्याचे कंपनीने सांगितले आहे. सध्याच्या कठीण काळामध्ये, या महामारीला तोंड देताना, लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, पगार कमी झाले आहेत. अशा स्थितीत नवीन आशा बाळगणे आणि स्वत:ला धीर देणे कठीण होऊन बसले आहे.

“प्रत्येकजण मेहनत घेतो पण प्रत्येकालाच मेहनतीचे फळ मिळतेच असे नाही. कधी कधी, आपल्याला नशिबाला संधी द्यावी लागते.” असे पाटील म्हणाले. व्यवसाय वाढवण्यासाठी आणि अधिक चांगली कामे करण्यासाठी जिंकलेली रक्कम गुंतवण्याचा त्यांचा मानस आहे. “यातून आम्हालाही खूप आनंद आणि समाधान मिळते. एका वाक्यात सांगायचे झाले तर आम्ही लोकांना त्यांची स्वप्ने आणि इच्छा पूर्ण करण्यास मदत करतो. आम्हाला आशा आहे की अशाच प्रकारे लोकांचे भविष्य आम्ही उज्ज्वल करत राहू.” असे व्यवस्थापकीय संचालक एम अँड सी, जोस चार्ल्स मार्टिन म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -