- Advertisement -
निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणातील गावांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून राज्य सरकार या गावांना आणि ग्रामस्थांना पुन्हा आपल्या पायावर उभे करण्यासाठी काहीही कमी पडू देणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या रत्नागिरी जिल्यातील काही गावांना भेटी देऊनशिंदे यांनी नुकसानीची पाहाणी केली. तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
- Advertisement -