- Advertisement -
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ हे धुळे दौऱ्यावर होते. यावेळी छगन भुजबळ म्हणाले, राज्यामध्ये ओबीसींच्या 55 ते 56 हजार जागा असून ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, केंद्र सरकारने इंपेरिकल डेटा देण्यास नकार दिला आहे. त्यासाठी आमची सातत्याने लढा सुरू राहील. 50 टक्के संदर्भात म्हटले की, संविधानामध्ये कुठेही म्हटलेले नसून 27 टक्के आरक्षण शाबूत राहावी एवढीच आमची इच्छा आहे.
- Advertisement -