- Advertisement -
कोरोनाच्या संकट काळात माणसांनी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवून या आजाराला हरवायचे आहे, असे वारंवार सांगितले जाते. त्यासाठी योग्य आणि सकस आहार घेणे गरजेचे आहे. मात्र या व्हायरल व्हिडिओमध्ये दाखवले जात असल्याप्रमाणे जर आपल्या ताटात किडकी, खराब झालेली भाजी आली तर आरोग्य चांगले कसे राहिल, हा प्रश्न आलाच. मुंबईतील बहुतांश परप्रांतिय आपापल्या राज्यात गेले असले तरी काही जण अजूनही मुंबईत व्यवसाय करत आहेत. शिवडीतील एका तरुणाने तिथे भाजी विक्री करणाऱ्या भय्याची पोलखोल केली आहे. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.
- Advertisement -