- Advertisement -
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत १०२ व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून भाजपवर घणाघाती हल्ला चढवला. तसचं घटनादुरुस्तीचं विधेयक अपूर्ण आहे, असंही ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्रम मोदींना चिमटे काढले. चूक झाल्यानंतर तिचा इव्हेंट कसा करावा आणि चूक सुधारल्यानंतर त्याचा उत्सव करण्याचाही इव्हेंट कसा करावा, हे सरकारकडून शिकायला हवं. चुकीचाही उत्सव आणि चूक सुधारण्याचाही इव्हेंट, एवढा कॉन्फिडन्स सरकारकडे येतो कुठून? असा खोचक टोला राऊतांनी भाजपला लगावला.
- Advertisement -