- Advertisement -
२६ नोव्हेंबर २००८ साली पाकिस्तानातून आलेल्या १० दहशतवाद्यांनी, मुंबई हादरवून टाकली होती. २६/११ च्या या हल्ल्याला आज बरोबर १२ वर्ष पूर्ण होत आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यात, शेकडो लोकं मृत्युमुखी पडली. तर कित्येक लोकांनी, आपलं सर्वस्व गमावलं. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पोलिसांनीही प्राणाची आहुती दिली. समुद्र मार्गे आलेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यानं अनेकांच्या काळजावर खोल जखमा केल्या.
- Advertisement -