- Advertisement -
महाराष्ट्रात टीईटी घोटाळ्यामध्ये अनेक उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांचे प्रमाणपत्र अपात्र ठरवण्यात आले असून सत्तार यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. अब्दुल सत्तार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून टीईटी घोटाळ्यामध्ये करण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. बदनाम करण्यासाठी आरोप करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे
- Advertisement -