- Advertisement -
भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकची सुरुवात झाली असून स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी भारताने पदकांचे खाते उघडले. भारताची वेटलिफ्टर मीराबाई चानूने टोकियो ऑलिम्पिकच्या ४९ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. मीराबाई चानूचा इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता. मीराबाई सोबतच तिच्या आईने देखील लहाणपणीच मीराबाईला वेटलिफ्टर बणवण्याचे स्वप्न पाहिले होते.
- Advertisement -